मुंबई : वाढलेली प्रवासी संख्या व लोकल फेऱ्याही वाढल्याने उपनगरीय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडील २०० जवान रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. तसा प्रस्ताव लवकरच पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक मुख्यालयाकडे पाठविला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या लाटेनंतर करोनाचा संसर्ग कमी होताच रेल्वे प्रवासाबाबतचे नियम शिथिल करण्यात आले. यात दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. दोन लसमात्रा घेऊन प्रवास करणाऱ्यांची संख्येत हळूहळू वाढ होत गेली. त्यामुळे अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच या प्रवाशांचीही भर पडल्याने प्रवासी सुरक्षा व्यवस्थेवरील ताण वाढू लागला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 members of maharashtra security force will soon join railway security force akp
First published on: 28-01-2022 at 01:01 IST