मुंबई : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धस्थितीमुळे जीव टांगणीला लागलेले तेथील भारतीय नागरिक आणि त्यांचे भारतातील हवालदिल नातेवाईक यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. युक्रेनमधील २१९ भारतीय नागरिकांना घेऊन आलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे सुरक्षित अवतरण शनिवारी रात्री ७ वाजून ४० मिनिटांनी मुंबई विमानतळावर झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमानतळाबाहेर पडताच नातेवाईकांनी विद्यार्थ्यांना गराडा घातले. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या नातवंडांना घेण्यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या  आजी-आजोबांनी त्यांची गळाभेट घेत आनंद साजरा केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 219 indians return safely from ukraine at mumbai airport akp
First published on: 27-02-2022 at 00:45 IST