महिनाभरात तीन ‘सीएनजी’ बस जळून खाक झाल्याने ‘बेस्ट’ने अशा ४०० बस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. अंधेरी
रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे बुधवारी सीएनजी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर ‘बेस्ट’ने हे पाऊल उचलले. मे. मातेश्वरी कंपनीद्वारे चालविण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या ‘सीएनजी’वर चालणाऱ्या दोन बसगाडय़ांना आग लागण्याच्या घटना आधीच घडल्या होत्या. बुधवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. बेस्ट बस क्रमांक ४१५ अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे आली तेव्हा ती प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. शेवटचा थांबा असल्याने सर्व प्रवासी उतरल्यानंतर ६.५५ च्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. २० ते २५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत बस आगीत खाक झाली. आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

वेळापत्रकावर परिणाम?
बसमध्ये आवश्यक बदल आणि योग्य उपाययोजना करेपर्यंत ४०० बसगाडय़ा बंद ठेवण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने घेतला. त्यामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस प्रवासाचे नियोजन करताना प्रवाशांनी ४०० बस बंद असल्याचे लक्षात घ्यावे, असे आवाहन ‘बेस्ट’ने केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 400 cng buses of best stopped due to three bus fires in a month amy
First published on: 23-02-2023 at 04:16 IST