मुंबई : police recruitment students पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असताना राज्यभरात तब्बल साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, बीटेक, एमकॉम, एमबीए अशा उच्चशिक्षित सुमारे ६८ हजार जणांनीही आणि ६८ तृतीयपंथीयांनीही अर्ज केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य पोलीस दलातील १८ हजार ३३१ पदांसाठी सुमारे १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलीस दलासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट आहे. पण तब्बल सहा लाख ३९ हजार ३१७ पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात कला व वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. याशिवाय विज्ञान शाखेतून पदवी संपादन केलेल्या तरुणांनीही अर्ज केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांनीही या भरतीसाठी अर्ज केले आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर, अभियांत्रिकी शाखा, वकील, एमबीए शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Applications graduates police recruitment 68 thousand candidates post graduate education mumbai print news ysh
First published on: 23-01-2023 at 01:19 IST