मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय नायक सलमान खान आणि लोकप्रिय गायक अरिजित सिंह यांच्यात गेले नऊ वर्षांहून अधिक काळ धुमसत असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या निमित्ताने अरिजितने सलमानसाठी गायलेल्या ‘लेके प्रभु का नाम’ या पहिल्यावहिल्या गाण्याची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. खुद्द सलमान खानने आपल्या समाजमाध्यमावरून या गाण्याची माहिती देतानाच ‘ओ हाँ… यह है अरिजित सिंह का पहला गाना मेरे लिए …’ म्हणत ही खुशखबर दोघांच्या चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा >>> रेखा यांना अमिताभविषयी ‘तो’ प्रश्न कसा विचारला? सिमी गरेवाल यांनी जयललितांचा उल्लेख करत दिलेलं उत्तर

rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडणाऱ्या अरिजित सिंहची छबी माध्यमांनी टिपली होती. सलमान खानबरोबर झालेल्या वादामुळे अरिजितला अनेक संधींना मुकावे लागले, त्याने जाहीर माफी मागूनही आजवर सलमानने आपल्या कोणत्याही चित्रपटात त्याला गाण्याची संधी दिली नव्हती. त्यामुळे अचानक नऊ वर्षांनंतर अरिजितला त्याच्या घरातून बाहेर पडताना पाहिल्यानंतर त्यांच्यातील वाद संपुष्टात आल्याची कुणकुण सगळ्यांना लागली होती. आता सलमाननेच आपल्यासाठी अरिजितने गाणे गायले असल्याची वर्दी देत या वादावर पडदा टाकला आहे. ‘टायगर ३’ या सलमानच्या आगामी चित्रपटातील ‘लेके प्रभु का नाम’ हे पहिले गाणे आज प्रकाशित झाले आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायले आहे.

काय होता वाद?

२०१४ साली एका चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आलेल्या अरिजित सिंह आणि सोहळ्याचे सूत्रसंचलन करणाऱ्या सलमान खान यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर नाराज झालेल्या सलमानची माफी मागण्याचे हरएक प्रयत्न अरिजितने केले. या दोघांमध्ये दिलजमाई व्हावी यासाठी इंडस्ट्रीतील काहींनी प्रयत्नही केले, पण सलमानच्या निर्धारात फरक पडला नाही. उलट २०१६ मध्ये अरिजितने ‘सुलतान’ चित्रपटासाठी सलमानच्या तोंडी असलेले ‘जग घूमिया’ हे गाणे गायले होते. मात्र सलमानच्या सांगण्यावरून ते गाणे काढून त्याऐवजी राहत फतेह अली खानने गायलेल्या गाण्याचा समावेश चित्रपटात करण्यात आला. त्यावेळी अरिजितने फेसबुकवरून सलमानची जाहीर माफी मागितली. हा वाद मिटवण्याचा त्याचा अखेरचा प्रयत्न असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्यानंतरही या दोघांमधील दुराव्यात काही फरक पडला नाही. अखेर ‘टायगर ३’च्या निमित्ताने हे दोघेही एकत्र आले आहेत.