मुंबई : पाली हिल जलाशयाच्या इनलेट व आऊटलेटवरील एकूण चार झडपा (व्हॉल्व्ह) बदलण्याचे कामकाज महानगरपालिकेने हाती घेतले आहे. हे काम गुरुवार, ३१ जुलै रोजी सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत म्हणजेच एकूण १४ तास सुरू राहणार आहे. या कालावधीत एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ ते ५ दिवस पाणी उकळून – गाळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
– हनुमान नगर, लक्ष्मी नगर युनियन पार्क मार्ग क्र. १ ते ४, पाली हिल आणि च्युईम गावाचा काही भाग (दुपारी २ ते सायंकाळी ५ या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार)
– नर्गिस दत्त मार्ग, पद्मश्री देव आनंद मार्ग (जिग जॅग मार्ग) (रात्री १० ते मध्यरात्री १ या कालावधीत पाणीपुरवठाबंद राहणार)
– नर्सिंग दत्त मार्ग, पाली माला मार्ग (सकाळी १० ते दुपारी १२.३० या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहणार)
या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
– कांतवाडी परिसराचा काही भाग, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग (सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार).
– खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, च्युईम गावठाण, गझधरबंध झोपडपट्टीचा काही भाग, खार पश्चिमेचा काही भाग (सायंकाळी ५.३० ते रात्री १० या कालावधीत कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार).