कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या १९९७ मध्ये झालेल्या हत्या प्रकरणातून कुख्यात गुंड छोटा राजन याची विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. राजन याने सामंत यांची हत्या करण्याचा कट रचला होता हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही, असे निरीक्षण विशेष न्यायालयाने राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका करताना नोंदवले.

हेही वाचा >>> लंडनमधून आलेल्या तरूणीवर मुंबईत अत्याचार; अत्याचाराचा व्हिडिओ स्नॅपचॅटवर प्रसारित

uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
Sandip Ghosh
Sandip Ghosh R G Kar Hospital : “आरोप सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते”, संदीप घोष यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने नोंदवलं महत्वाचं निरीक्षण
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे
Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
Giving judgments that government does not like enhances image of court says Justice Abhay Oak
वेळप्रसंगी सरकारला नावडते निर्णय दिल्याने न्यायालयाची प्रतिमा उंचावते : न्या. अभय ओकांचे स्पष्ट प्रतिपादन
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप

डॉ. सामंत यांच्या चालकासह खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. त्यांनी सीबीआयच्या दाव्याला समर्थन देण्यास नकार दिला. परिणामी, आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी अन्य साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही, असेही न्यायालयाने सीबीआयच्या तपासावर ताशेरे ओढताना नमूद केले. प्राथमिक तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांवर राजन याच्याविरोधातील खटला प्रामुख्याने चालवण्यात आला. राजन याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली असली तरी त्याच्यावर बरेच खटले सुरू असल्याने तो कारागृहातच राहणार आहे.

हेही वाचा >>> कारागृहात गळफास लावून आरोपीची आत्महत्या

सामंत यांनी १९८१ मध्ये मुंबईत कापड गिरणी कामगारांच्या संपाचे नेतृत्त्व केले होते. दीर्घकालीन संप म्हणून या संपाची ओळख आहे. सामंत यांची १६ जानेवारी १९९७ रोजी पंतनगर, घाटकोपर येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सामंत हे त्यांच्या गाडीने कार्यालयात जात असताना हा हल्ला करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या. राजन याने सामंत यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला होता. खटल्याच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच, जुलै २००० मध्ये निकाल देण्यात आला. राजन याला अटक करण्यात आल्यावर त्याच्यावर स्वतंत्र खटला चालवण्यात आला. या प्रकरणी कुख्यात गुंड गुरू साटम आणि राजन याचा हस्तक रोहित वर्मा यांना फरारी आरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे.