गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, निकालात भाजपाला मोठं यश मिळताना दिसत आहे. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुजरात निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचं अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे. भाजपाला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करत आणि सर्वांना शुभेच्छा देतो.”

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
ravi rana bachchu kadu
“बच्चू कडूंसमोर हात जोडून विनंती करतो…”, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा नरमले?
Supriya Sule on Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrested by ED Marathi News
“पापी पेट का सवाल…”, केंद्रीय यंत्रणांची बाजू घेत सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींवर टीका

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे”

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला जी-२० चं अध्यक्षपदही मिळालं आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. जी-२० चं नेतृत्व मोदींनी करणं हीदेखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये १४ बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का?

गुजरातची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना विचारला. त्यावर ते म्हणाले, “आज आम्ही महाराष्ट्रात भरपूर काम करत आहोत. मुंबईचं सुशोभिकरण सुरू आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर करून कायापालट झाला पाहिजे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे.”

हेही वाचा : Gujarat Election Results 2022 Live : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाच, १५० चा आकडा पार करणार, काँग्रेसचा दारुण पराभव; वाचा प्रत्येक अपडेट

“…म्हणून आम्ही सरकार बदललं”

“मुंबईत देशातील-विदेशातील पर्यटक येतात. त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने आजपर्यंत मिळाल्या नाहीत. म्हणून आम्ही सरकार बदललं. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं सरकार आहे. मुंबईचाही कायापालट झाला पाहिजे. म्हणून आम्ही स्वच्छता आणि सुशोभिकरणाला प्राधान्य दिलं. लवकरच हे दृश्य स्वरुपात दिसेल आणि मुंबईकरांना लाभ होईल,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.