लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : सण – उत्सव, सामाजिक, खासगी कार्यक्रमाच्या कालावधीत परिसर आकर्षक दिसावा म्हणून रस्त्यालगच्या वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात येते. या रोषणाईमुळे वृक्षांच्या वाढीवर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे आणि मिरा -भाईंदर महापालिका तसेच राज्याच्या पर्यावरण विभागाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. दरम्यान, या विद्युत रोषणाईमुळे केवळ वृक्षांच्या वाढीवर परिणाम होत नाही तर, कीटक, पक्ष्यांसाठी हे घातक ठरतात. रात्रीच्या अंधारात अचानक प्रकाशझोत आल्यास वन्यप्राणी संभ्रमित होण्याचा धोका असतो.

IVF, infertility, artificial insemination, Aditya Birla Memorial Hospital, Oasis Fertility, World IVF Day, technology advancements, success rate, assisted hatching, embryoscope, gametes activation, microfluids, pre genetic testing, pune news, latest news, loksatta news,
कृत्रिम गर्भधारणेकडे वाढतोय ओढा, बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाच्या समस्येत वाढ; जोडप्यांची आयव्हीएफला पसंती
nipah zika chandipura virus india
Nipah, Zika, Chandipura; हे प्राणघातक विषाणू भारतासाठी चिंतेचा विषय का ठरत आहेत?
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
bear attacks in Japan is looking to ease laws around shooting bears
माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?
prevent allergies this monsoon
“आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!” मान्सूनमध्ये ‘या’ सात पदार्थांचे सेवन करून संसर्ग टाळा
Arm mobile app will work for information about accidental death of wild animals
वन्यप्राण्यांच्या अपघाती मृत्यूच्या माहितीसाठी काम करणार ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती
Hair Grown Inside Throat
‘या’ एका सवयीमुळे घशात वाढू लागले केस; ५ सेमी लांब केस काढण्यासाठी मारल्या हॉस्पिटलच्या फेऱ्या; हा आजार नेमका काय?

वायू प्रदूषण, जल प्रदूषणाच्या समस्येला तोंड देत असतानाच प्रकाश प्रदूषणाकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सध्या रस्त्यावरील दिवे, व्यावसायिक फलक आणि वृक्षांवरील विद्युत रोषणाईमुळे विजेचा अपव्यय होत आहे. तसेच दिवसेंदिवस कृत्रिम प्रकाशाचे प्रमाण वाढत आहे. शहरातील झगमगाटीमुळे रात्री स्थलांतरित पक्षी बिचकतात. रात्रीच्या अंधारात अचानक प्रकाश पडल्यास वन्यजीव संभ्रमित होतात. प्रवाळासारखे समुद्री जीव प्रजनन थांबवतात. तसेच कासवाची अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले रात्री समुद्राकडे धाव घेतात, मात्र प्रकाशाचा अडथळा आल्यास मागे फिरतात आणि त्यातील अनेक पिल्ले मृत्युमुखी पडतात. पर्यावरण तज्ज्ञांनुसार प्रकाश प्रदूषणाचा वन्यजीव, पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम होतो, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा-मुंबई : आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या

वृक्षांवरील विद्युत रोषणाई, दिवे यामुळे लहान कीटक विचलित होऊन संपूर्ण रात्र त्या प्रकाशाभोवती घिरट्या घालून थकून मृत्यू पावतात किंवा त्यातील जे काही जगतात, त्यांची प्रजनक्षमता कमी होते. वृक्षांवर रोषणाई केल्यामुळे अवेळी पानगळ होते.

प्रकाश प्रदूषणाचा पक्षी,प्राणी आणि मानवी जीवनावरही परिणाम होतो. विद्युत रोषणाई, डिजिटल फलक यामुळे पक्ष्यांची दृष्टी जाते, तसेच त्यांचा अपघात होतो. काही दिवसांपूर्वी पथदिव्यांमुळे नवी मुंबईतील नेरूळ जेट्टी परिसरात दिशादर्शक फलकाला आदळून ७ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना याचाच भाग आहे. -बी. एन. कुमार, पर्यावरण अभ्यासक, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन