मुंबई : दिल्लीतील पालिका बाजारच्या धर्तीवर मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. भूमिगत बाजार सुरू करून त्यात फेरीवाल्यांना जागा देण्याचे ठरवण्यात आले होते.

मोकळ्या भूखंडांच्या खाली हे भूमिगत बाजार सुरू करण्यात येईल. त्यासाठी दोन जागांची निवड करण्यात आली होती. त्यात दादर टीटी व शीव परिसरातील जागेची निवड केली होती. मात्र, अद्याप या दोन जागांवर भूमिगत बाजार सुरू करण्यासाठी कोणतीही हालचाल संबंधित अधिकाऱ्यांनी न केल्यामुळे केसरकर यांनी कारवाईचा इशारा दिला. दर आठवड्याला मुख्यालयात येऊन केसरकर आढावा बैठक घेत आहेत.

हेही वाचा >>>गोविंदाच्या टी-शर्टवर राजकीय संदेश अन् नेत्यांची छबी; आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींचा टी-शर्टआडून प्रचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्यांमध्ये तणाव

भूमिगत बाजारविषयात काहीच प्रगती न झाल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी प्रशासनाला इशारा दिला. त्यांनी शुक्रवारी मुंबई व ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई केली. त्यातच बाजारविषयाच्या अधिकाऱ्यांनाही कारवाईचा इशारा दिल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.