लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आज, उद्या मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे,असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Shiv of Mumbai Mandal of MHADA was given to Mumbai District Central Bank for construction of Sahakar Bhawan at Pratishka Nagar Mumbai news
भूखंडाच्या बदल्यात म्हाडाला २५ कोटींची जागा
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
raigad heavy traffic ban marathi news
रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर बंदी, जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी
Dhule Fake foreign liquor marathi news
धुळे जिल्ह्यात बनावट विदेशी मद्याचा साठा ताब्यात
thane district, Barvi dam, eople on the banks of the river are alerted, marathi news, marathi updates
बारवी धरण काठोकाठ, बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Nashik Rain News
Nashik Rain : नाशिकमध्ये तुफान पाऊस, गोदावरी नदीला पूर आल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी; यलो अलर्ट जाहीर

मुंबईत रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३३.२ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील काही दिवस कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. दरम्यान,पुढील दोन ते तीन दिवस मात्र मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होऊन तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच सध्या वाऱ्यांची दिशा बदललेली आहे. पश्चिमेकडून येणारे वारे सध्या उत्तरेकडून वाहत आहेत आणि वाऱ्यांची ही दिशा पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याने मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

आणखी वाचा-मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

काय काळजी घ्यावी

  • उन्हात घरातून बाहेर पडताना छत्रीचा वापर करावा.
  • थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे.
  • उन्हामुळे तब्येत बिघडल्यानंतर तात्काळ संबंधिताला रुग्णालयात दाखल करावे.
  • उष्णतेच्या झळा बसल्यानंतर तात्काळ सावलीत बसावे.