मान्यवरांच्या उपस्थितीत महाअंतिम फेरी उत्साहात; रसिकांचा तुडुंब प्रतिसाद
विषयांची वैविध्यता, तुडुंब भरलेले सभागृह आणि राज्यातील आठ शहरांमधून प्राथमिक व विभागीय अंतिम फेऱ्या जिंकत महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले आठ वक्ते.. अशा भारलेल्या वातावरणात रविवारी रवींद्र नाटय़ मंदिरात ‘लोकसत्ता’ तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा सोहळा रंगला. महाराष्ट्राचा वक्ता दशहस्रेषु ठरण्यासाठी आठ वक्त्यांमध्ये रंगलेल्या चुरशीत अखेरीस बाजी मारली नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विवेक चित्ते याने. तर रत्नागिरीच्या फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचा ऋषिकेश डाळे स्पर्धेचा उपविजेता ठरला. पनवेलच्या पिल्लई कॉलेज ऑफ आर्टस्च्या रिद्धी म्हात्रेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
महाराष्ट्राची वक्त्यांची, विचारवंतांची दैदिप्यमान परंपरा पुढे नेताना तरुण पिढीतील नव्या वक्त्यांचा शोध घेणाऱ्या ’लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पध्रेचा महाअंतिम सोहळा रविवारी रवींद्र नाट्यगृहात रंगला. या सोहळ्याला ‘राशीचक्र’ कार शरद उपाध्ये आणि अभिनेता व दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्पध्रेच्या महाअंतिम फेरीसाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि कवयित्री नीरजा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
राज्यभरातील आठ शहरांमधून आलेल्या स्पर्धकांमधून ‘वक्ता दशहस्रेषु’ निवडणाऱ्या या स्पध्रेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले विषय हे त्यांच्या रोजच्या जगण्यातीलच असले तरी ते सोपे नव्हते. त्यामुळे विषयांची मांडणी करताना साहजिकच पुस्तकी संदर्भाच्या पलिकडे जात विद्यार्थ्यांना विचार करावा लागला हे त्यांच्या भाषणातून उपस्थितांनाही जाणवले. ‘लंगिकतेपलीकडचे जग’ हा विषय प्रथम मांडला गेला. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर या विषयाची मांडणी करताना पुण्याच्या निखिल कुलकर्णीने काळानुसार बदलत गेलेल्या स्त्री-पुरुष संबंधांचा वेध घेत पुराणकाळापासूनच या नात्यात लैंगिकतेपलीकडले मैत्र कसे महत्वाचे होते हे अनेकिवध उदाहरणांनी पटवून दिले.
‘बंदी, सक्ती सरकारनामा’ या विषयावर बोलताना मुळात बंदी, सक्ती आणि सरकार या तीन घटकांचा एकमेकांशी संबंध कसा असतो, याची सहज मांडणी नगरच्या विनया बनसोडेने केली. सुजाण नागरिक म्हणून नियम पाळले जात नाहीत, मग सरकार म्हणजेच आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना व्यवस्थेचा गाडा हाकण्यासाठी बंदी किंवा सक्तीचा आधार घ्यावा लागतो हे स्पष्ट करताना अर्निबध स्वातंत्र्याने वागणाऱ्या समाजावर सक्ती, बंदीमुळेच सुनियंत्रण साधता येते, असे मत तिने मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजेत्यांची नावे
* विवेक चित्ते, नाशिक
(यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) : प्रथम पारितोषिक
* ऋषिकेश डाळे, रत्नागिरी (फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट) : द्वितीय पारितोषिक
* रिद्धी म्हात्रे, ठाणे (पिल्लई कॉलेज ऑफ कॉमर्स, पनवेल) : तृतीय पारितोषिक
* आदित्य जंगले, मुंबई (रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा) : उत्तेजनार्थ
* भुवनेश्वरी परशुरामकर, नागपूर (मॉरिस महाविद्यालय) : उत्तेजनार्थ
* लालित्यपूर्ण, शैलीदार वक्तृत्वासाठी प्रा. वसंत कुंभोजकर पुरस्कार : ऋषिकेश डाळे, रत्नागिरी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta oratory competition final round
First published on: 15-02-2016 at 03:01 IST