तापी नदीवरील धुळे व नंदुरबार जिल्ह्य़ातील पूर्ण झालेल्या प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील पाण्याच्या वापरासाठी धुळे जिल्ह्य़ातील आठ व नंदुरबार जिल्ह्य़ातील १४ अशा एकूण २२ सहकारी उपसा सिंचन योजनांची विशेष दुरुस्ती करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
४१.७८ कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती करण्यात येणार आहे.
सिंचन योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देताना अर्थसंकल्पीय तरतुदीच्या दोन टक्के मर्यादेतच प्रस्ताव हाती घेण्याचे राज्यपालांचे आदेश आहेत.
२२ उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी चालू वर्षांच्या ईआरएम अंतर्गत तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या तरतुदीतून केवळ ७. १६ कोटी खर्च करता येऊ शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
सिंचन योजनांसाठी राज्यपालांना साकडे
या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती करण्यात येणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 04-05-2016 at 00:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cabinet request governor for irrigation schemes