मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी उसळत असलेल्या हिंसाचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट करत दोषींवर कठोर कारवाईचे आदेश गृह विभागास दिले आहेत. तसेच राज्यातील वातावरण शांत राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात दंगली होणार ही सातत्याने विरोधकांकडून होणारी विधाने आणि त्याला लगेच एका विशिष्ट समुदायाकडून दिला जाणारा प्रतिसाद, त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरणाच्या घडणाऱ्या घटना या संबंधाची चौकशी करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कायदा हातात घेणाऱ्यांची गय करू नका, हिंसाचाराच्या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश  मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी असली तरी लोकांनीही त्यासाठी सहकार्य करावे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde appeals for peace amid tension in kolhapur zws
First published on: 08-06-2023 at 04:06 IST