मुंबई : लाचप्रकरणी अटक झालेल्या व्यक्तींवर आरोपपत्र दाखल करण्यास मंजुरी मिळावी, यासाठी २५६ प्रकरणांत स्मरणपत्रे पाठवूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रतीक्षा करावी लागत आहे. अभियोगपूर्व मंजुरीला विलंब लागत असल्यामुळे संबंधित लाचखोरांचा पुन्हा सेवेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर संबंधित लाचखोराविरुद्ध ९० दिवसांत आरोपपत्र दाखल करावे लागते. आरोपपत्र दाखल करण्यासाठी शासनाची किंवा सक्षम प्राधिकरण (म्हणजे संबंधित लाचखोर ज्या विभागात काम करतो त्या विभागप्रमुखाची) मंजुरी आवश्यक असते. अशी मंजुरी मिळाल्याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आरोपपत्र दाखल करता येत नाही. एकीकडे लाचखोर दोषी ठरण्याचे प्रमाण कमी असले तरी आरोपपत्र दाखल करण्याची मंजुरी वेळेत मिळत नसल्यामुळे संबंधित तपास अधिकारी बदलून गेला तर तपासावरही परिणाम होत असतो. त्यामुळे वेळेत अभियोगपूर्व मंजुरी आवश्यक असते, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government waiting for approval in 256 bribery cases zws
First published on: 07-07-2022 at 05:06 IST