scorecardresearch

Premium

एक लाखाहून अधिक शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत!; मराठवाडा, विदर्भात वंचितांची संख्या अधिक

राज्यातील एक लाख सहा हजार ३४० शेतकरी (मार्च २०२३ अखेर) पैसे भरूनही कृषीपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे.

water pump

सिद्धेश्वर डुकरे

मुंबई : राज्यातील एक लाख सहा हजार ३४० शेतकरी (मार्च २०२३ अखेर) पैसे भरूनही कृषीपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. त्यात मराठवाडा आणि विदर्भातील ८२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

राज्यात खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी, ५२ लाख, ८५ हजार, ४३९ इतकी आहे. त्यापैकी ४४ लाख ३९ हजार ९७५ शेतकऱ्यांना ३१ मार्च २०२१ अखेर कृषीपंप जोडण्या देण्यात आल्या. दरवर्षी सरासरी दोन लाखांच्या आसपास शेतकरी वीज जोडणीसाठी अर्ज करतात. त्यातील लाख ते सव्वा लाख  शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळते. परिणामी, दरवर्षी प्रतीक्षा यादी वाढत आहे. सध्या सर्वात मोठी प्रतीक्षा यादी मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची आहे. तिथे ४४ हजार ३११ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.

मराठवाडय़ानंतर प्रतीक्षा यादीत विदर्भातील शेतकऱ्यांचा क्रमांक लागतो. तिथे आजघडीस ३८ हजार २८४ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात १८ हजार ४७६ ,उत्तर महाराष्ट्रात चार हजार ८४२ आणि कोकण भागात ४२७ मागणी केलेले शेतकरी जोडणीवाचून वंचित आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची वीजजोड प्रतीक्षा यादी एक लाख ६ हजार ३४० इतकी  आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून राज्यात १४ जिल्ह्यांची सरकार दरबारी नोंद आहे. या जिल्ह्यांत आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. बहुतांश १४ जिल्हे हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत. याच भागांत वीज जोडणीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

शुल्क भरून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची ही शासकीय आकडेवारी असली तरी कृषीपंपासाठी अर्ज केलेल्या, मात्र शुल्क न भरलेल्या शेतकऱ्यांचा त्यात समावेश नाही. त्यामुळे एकूण आकडा अडीच ते तीन लाखांच्या घरात आहे. वर्षांनुवर्षे हा प्रकार सुरू आहे.

-प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: More than one lakh farmers are waiting for electricity connection ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×