Mumbai Breaking News LIVE Today, 28 February 2025 : महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो. राज्याचे प्रशासकीय मुख्यालय मंत्रायलय मुंबईत आहेच पण त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय पासून विविध संस्थांनी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहे. राजकीय घडामोडी मुंबईत घडत असतात. तेव्हा या मुंबईतील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai News LIVE Updates : मुंबईतील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
गोरेगाव येथील बारमधील हत्येप्रकरणी आरोपीला अटक
मुंबई : गोरेगाव येथील बारमध्ये एका खोलीत ४३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला असून वनराई पोलिसांनी देवराज गौडा(४४) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती, रघू उर्फ अरुण गौडा हा मालाड पश्चिमेतील एका बारमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता.
७७ वर्षांपूर्वीच्या भूसंपादनाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिकाकर्त्यांना दोन लाखांचा दंड
मुंबई : साधारणतः १९४७-४८ सालातील भूसंपादन प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांचे दावे हे परस्परविरोधी असून हरवलेल्या नोंदींचा गैरवापर करण्यासाठी त्याने ही याचिका केली, असे सकृतदर्शनी मत न्यायालयाने नोंदवले.
फेब्रुवारीत मुंबईत १२ हजार घरांची विक्री, घरविक्रीतून ९०० कोटींहून अधिकचा महसूल
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात मुंबईत १२ हजार घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसूलीच्या रुपाने ९०० कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे. फेब्रुवारीच्या २८ दिवसांत १२ हजारांहून अधिकची घरविक्री झाल्याने ही घरविक्री समाधानकारक मानली जात आहे.
अखेर सिस्ट्राची नरमाईची भूमिका; एमएमआरडीएचे आरोप अमान्य, पण त्यांच्याबरोबर काम करण्याचीही इच्छा
मुंबई : मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचे आरोप सिस्ट्रा कंपनीने फेटाळून लावले आहेत. मात्र, त्याचवेळी एमएमआरडीएबरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमएमआरडीएशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद सुरु असल्याचेही सिस्ट्राने स्पष्ट केले आहे.
२६/११च्या हल्ल्याशी संबंधित खटल्यात निर्दोष सुटका होऊनही रिक्षा चालवण्यासाठी पोलिसांची हरकत,फहीम अन्सारीची उच्च न्यायालयात धाव
मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यातून निर्दोष सुटका होऊनही फहीम अन्सारी याला उदरनिर्वाहासाठी झगडावे लागत आहे. रिक्षा चालवून उदरनिर्वाह करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. परंतु, त्यासाठी पोलीस त्याला ना हरकत प्रमाणपत्र नाकारत आहेत. त्यामुळे, फहीम याने अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली असून रिक्षा चालवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत पोलिसांना आदेश देण्याची मागणी केली आहे.
Mumbai Metro 3: मुंबईच्या वाहतुकीला नवीन गती; मेट्रो ३ ची ट्रेन ‘कफ परेड’ स्थानकात दाखल
मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रोने आज ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ‘ॲक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-३ च्या ट्रेनने कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) साठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला असून मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठी समस्या लवकरच सुटणार आहे. सविस्तर बातमी वाचा
धारावी प्रकल्प तब्बल तीन लाख कोटींचा, प्रकल्पाचा बृहत आराखडा महिन्यात पूर्ण होणार
मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसून धारावीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठीचा बृहत आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्पात असून महिन्यात आराखडा पूर्ण होईल. त्यानंतर हा आराखड्याच्या मसुदा जाहीर करून त्यावर सूचना-हरकती मागविण्यात येणार आहेत.
धारावी प्रकल्प : पुनर्वसन इमारतींसाठी तब्बल १० कोटी चौ.फुट क्षेत्रफळ, तर विक्रीसाठी उपलब्ध होणार १४ कोटी चौ. फुट क्षेत्र
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील ५९० एकर क्षेत्र अधिसूचित असले तरी प्रत्यक्षात यातील ३५ ते ४० टक्के क्षेत्रावर पुनर्विकास प्रकल्प राबविला जाणार आहे. असे असले तरी या पुनर्विकासासाठी ग्लोबल चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळणार आहे. त्यानुसार १० कोटी चौ. फुट क्षेत्रावर पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार आहेत.
मुंबई : शिवाजी पार्कच्या धुळीच्या प्रश्नावर आता हरित लवादाकडे दाद मागणार
मुंबई : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा प्रश्न सुटण्याचे काही चिन्ह दिसत नसून मुंबई आयआयटीच्या सूचनेनुसार मैदानावर गवत पेरणी करण्यास अद्याप सुरूवात झालेली नाही. तर मैदानावर गवत पेरणी करण्यापेक्षा माती काढण्याचीच गरज असल्याचे येथील काही रहिवाशांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या बीकेसी येथे मुंबई एआय टेक वीक २०२५ ला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
मुंबईच्या बीकेसी येथे मुंबई एआय टेक वीक २०२५ ला देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
Video: ‘मी पडलोच नसतो तुझ्या फंदात…’, पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’चा ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे.
Stock Market Crash : सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला, भारतीय शेअर बाजारातील पडझडीमागे नेमकं काय कारण?
Stock Market Crash : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात सतत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजही (२८ फेब्रुवारी) शेअर बाजारात १००० अंकांनी घसरला आहे.
रेल्वे भूखंडाबाबत असलेल्या ‘अटी’मुळेच धारावी पुनर्वसनातील इमारतींना विलंब?
मुंबई : धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेच्या ४३ एकर भूखंडापैकी २३ एकर भूखंड ताब्यात आला असून त्यापैकी साडेसहा एकर भूखंडावर रेल्वे वसाहतींच्या चारपैकी तीन इमारतींचे काम सुरू करण्यात आले आहे.
मुंबई : भायखळ्यातील ५७ मजली इमारतीला भीषण आग
मुंबई : भायखळा येथील बी. ए मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिल जवळच्या एका बहुमजली इमारतीला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक आग लागली.
कायदे करून महिलांविरोधातील गुन्हे थांबणार नाहीत – चंद्रचूड
मुंबई : दिल्लीतील ‘निर्भया’ घटनेनंतर महिलांशी संबंधित कायद्यात अनेक बदल करण्यात आले. परंतु, केवळ कायदे करून अशा घटना रोखू शकत नाही. या घटना रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी, असे मत माजी सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गुरुवारी व्यक्त केले.
SEBI New Chairman : तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; तीन वर्षांचा असणार कार्यकाळ
SEBI New Chairman Tuhin Kanta Pandey: सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या (SEBI) अध्यक्षपदी वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींचा अपहार : १५ कोटी रुपये स्वीकारणाऱ्या संशयीताला अटक
मुंबई : ‘न्यू इंडिया को ऑप बँके’तील १२२ कोटी रुपयांच्या अपहारातील १५ कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलम (३३) याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी अटक केली. मनोहर याचे वडील उन्ननाथन अरूणाचलम ऊर्फ अरूण भाई यांना बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याने ४० कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स