मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार आता मुंबईत ८ एप्रिलपर्यत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असेल. या काळात ध्वनीवर्धकाचा वापर, बँड, तसेच फटाके फोडण्यासदेखील बंदी असेल. मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी तसे आदेश दिले आहेत.

जमावबंदीच्या आदेशामध्ये काय आहे ?

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू केली असली तरी त्यामागे नेमके कारण काय आहे ? असा प्रश्न विचारला जातोय. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेदेखील मुंबई पोलिसांनी म्हटलंय. “बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. यानुसार ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करण्यास मनाई असेल. मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध असेल,” असे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.

तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ८ एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर (Flying Activities)बंदी घालण्यात घालण्यात आली आहे. तसा आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केला आहे.