संकटाच्या वेळी आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचे आपण आयुष्यभर उतराई होतो, पण अशाच वेळी जर कोणी आपल्या परिस्थितीची थट्टा केली की त्या अपमानाची बोच आयुष्यभर लागून राहते. मनोज सिंग याला पशांची गरज होती. त्याने आपल्या पत्नीच्या साडूच्या भावाची परिस्थिती चांगली असल्याने त्याने त्याच्याकडे पशांची मागणी केली. पण, त्याच्या बदल्यात त्याला पसे तर मिळाले नाहीच, पण पदरी पडला अपमान, अवहेलना. मग या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने थेट त्याचे अपहरण करून दोन कोटी रुपये उकळण्याचे ठरवले. मित्रांना पोलीस बनायला सांगून त्याने अपहरणही घडवून आणले, पण पोलिसांकडे हे प्रकरण गेल्याचे कळताच भीतीने त्याची गाळणच उडाली आणि अखेर त्याचा सूडाग्नी तुरुंगात जाऊनच शांत झाला.
एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर असलेला मनोज सिंग याला चपलांचा स्वतचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्याच्या साडूचा भाऊ संजय शहा हा शेअर व्यवसायात चांगले कमावत होता. संजय आपल्याला मदत करेल या आशेने दोन वर्षांपूर्वी मनोजने संजयला पशांची मागणी केली. पण त्यावेळी संजयने ती धुडकावून लावली. मनोजने व्यवसाय सुरू केला पण, काही दिवसांपूर्वी पुन्हा मनोजने संजयकडे आíथक विवंचनेत असल्याचे सांगून पसे मागितले. यावेळी संजयने मनोजची टिंगल केली. आपल्या कुटुंबीयांसमोर आपला झालेला अपमान मनोजला बोचत राहिला. संजयला पशांचा माज असून तो उतरवलाच पाहिजे, असे मनोजने ठरविले. मनोजसोबत काम करणाऱ्या राहुल ओझा याला त्याने संजयचे अपहरण करायचे असे सांगितले. त्यासाठी आणखी दोन माणसे जमविण्यास सांगितले. व्यवसायाने चालक असलेले मंगेश माने आणि रुपेश लाड मनोजला भेटले. कोणालाही शंका येणार नाही अशाप्रकारे हे अपहरण करण्याचे चौघांनीही ठरविले. अपहरण करण्यासाठी पोलिसांचेच कपडे वापरले तर कुणालाच काही कळणार नाही, असे सगळ्यांचे मत पडले. मग, तिघांनीही प्रतिदिन ४५० रुपये भाडय़ाने पोलिसांचे कपडे घेतले. कारमधून येऊन पोलीस असल्याचे सांगत संजयला उचलून आणायचे असा कट त्यांनी रचला. सलग सात ते आठ दिवस रोज हे रुपेश, राहुल आणि मंगेश संजयच्या अपहरणासाठी निघायचे पण, कधी खऱ्या पोलिसांची गाडी जवळपास दिसायची तर कधी संजयसोबत कुटुंबीय असायचे. रोजचा खर्च टाळण्यासाठी तिघांनी माप देऊन पोलिसांचे कपडेही शिवायला टाकले.
गुरुवार १७ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कांदिवली, चारकोप सेक्टर १ येथे राहणारे संजय शहा दुरुस्तीकरता दिलेला चष्मा आणण्यासाठी त्यांच्या मोटारसायकलवरून बोरिवली येथे जात होते. चारकोप बस डेपो जवळ ते पोहोचले तोच तिघांनी त्यांची वाट अडवली. आम्ही गुन्हे शाखेतून आलो असून तुमची चौकशी करायची आहे, असे सांगून त्यांनी शहा यांना कारमध्ये बसवले. शहा यांना नेमके काय होतेय हे कळतच नव्हते. कारमध्ये बसल्या बसल्या शहा यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. त्यानंतर, एका कारखान्यात शहा यांना नेल्यानंतर अपहरणकर्त्यांनी शहा यांच्या भावाला फोन करून त्यांच्या अपहरणाविषयी सांगितले आणि शहा यांच्या मुक्ततेसाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. घाबरलेल्या शहा यांच्या पत्नीने तडक चारकोप पोलीस ठाणे गाठून त्याची माहिती दिली. दरम्यान, मनोजने पत्नीला संजयच्या अपहरणाविषयी सांगितले, तशी ती संजयच्या घरी गेली. तिच्या माध्यमातून मनोज शहा कुटुंबीय पशांची तयारी करत आहेत का, याची माहिती घेत होता. पण, पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच त्याची भीतीने गाळण उडाली. त्यांनी संजयला मारहाण करत त्याच्याकडे असलेला सर्व ऐवज काढून त्याला ठाणे घोडबंदरला सोडून दिले. कोणाला काही कळणार नाही, अशा प्रकारे चारही जण आपापल्या घरी परतले. इथे, अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलीस उपायुक्त (परिमंडळ ११) विक्रम देशमाने यांनी निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली पथके सज्ज केली. पथकाने चौकशी करत, तांत्रिक तपासाचा आधार घेतला. तसा मनोजचा यात हात असल्याचे त्यांना कळाले. मग निरीक्षक महेश तावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी, दहिफळे यांनी मनोजसह त्याच्या तीनही साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी उठलेल्या मनोजसह त्याला साथ देणारे तीनही मित्रांची रवानगी आता पोलीस कोठडीत झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2016 रोजी प्रकाशित
त्याचा सुडाग्नी तुरुंगात जाऊनच शांत झाला..
एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर असलेला मनोज सिंग याला चपलांचा स्वतचा व्यवसाय सुरू करायचा होता.
Written by अनुराग कांबळे
Updated:

First published on: 26-03-2016 at 01:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police solve kidnapping case