मुंबई : उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी काहिली बुधवारीही कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद मंगळवारी झाली. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी अधिक नोंदले गेले. यापूर्वी २२ एप्रिल रोजी ३९ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३ अंशानी अधिक होते. सांताक्रूझ केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा ६ अंशानी अधिक होते.

370 mm of rain in Lonavala, rain in Lonavala, Two days off for schools,
पर्यटन नगरी लोणावळ्यात २४ तासात ३७० मिलिमीटर पाऊस; शाळांना दोन दिवसांची सुट्टी
Maharashtra recorded 32 percent more rainfall than the average Pune
राज्यात सर्वदूर दमदार पाऊस; सरासरीपेक्षा ३२ टक्के जास्त पावसाची नोंद
Record break rain in Lonavala 275 mm of rain recorded
लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पाऊस! २४ तासात २७५ मिलिमीटर पावसाची नोंद
Ethanol blend, petrol, India, June 2024, Petroleum Planning and Analysis Department, Union Petroleum Ministry, blending centres, maize production, central government, Maize Research Institute of India, ethanol target, All India Petrol Dealers Association,
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाची उच्चांकी पातळी, जूनमध्ये १५.९० टक्के मिश्रण
average rainfall , Mumbai,
मुंबईत आतापर्यंत सरासरीच्या ४५ टक्के पाऊस, गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस
Record Breaking Rainfall in Lonavala, Rainfall of 216 mm in Lonavala, heavy rainfall in lonavala, tourist going back lonavala, tourist in lonavala, lonavala news, rain news, latest news, loksatta news,
लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल २१६ मिलिमीटर रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद
35 percent less rain than average in Mumbai warning of heavy rain on Monday
मुंबईत सरासरीपेक्षा ३५ टक्के पाऊस कमी, सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा
52 percent sowing
पावसाने सरासरी गाठली; पेरण्या ५२ टक्क्यांवर

हेही वाचा >>> विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश

राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमान (४२.४) जळगाव येथे नोंदवले गेले. त्याखालोखाल ठाणे-बेलापूर केंद्रात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, रायगड येथे उष्णतेची लाट कायम असेल मात्र त्याची तीव्रता कमी असेल. तसेच कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानंतर पुढील दोन तीन दिवसानंतर तापमानात आणखी २ ते ३ अंशानी घट जाणवू शकेल असेही स्पष्ट केले आहे.  दरम्यान, बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शाळांना सुट्टी जाहीर करा – राज ठाकरे

राज्यातील तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता त्याचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करुन शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून पोस्टमध्ये शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली.

उष्माघाताचे पाच नवे रुग्ण

मुंबई : राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये धुळयामधील तीन तर ठाणे व सोलापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे ७७ रुग्ण आढळून आले होते.