हेलपाटे घालून हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या घोळामुळे निर्माण झालेल्या प्रदीर्घ निकाल रखडपट्टीनंतर जाहीर झालेल्या निकालांमध्ये असणाऱ्या असंख्य त्रुटींचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील मदतकेंद्र अपुरे पडत असल्याने आता ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आले आहे. निकालाबाबतच्या तक्रारींचा पाढा घेऊन दररोज विद्यापीठाचे हेलपाटे घालणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्रामुळे तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश अर्ज करण्यासाठीची मुदत विद्यापीठाने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली होती. परंतु ४७७ परीक्षांच्या निकालांपैकी अद्याप १७ निकाल प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ही मुदत ८ सप्टेंबर वाढविण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university sets up grievance redressal portal for students
First published on: 05-09-2017 at 04:23 IST