मुंबई : वेळोवेळी परिपत्रके, सूचना आणि स्मरणपत्र काढूनही काही महाविद्यालयांनी अद्यापही ‘महाविद्यालय विकास समिती’ स्थापना केली नसल्याचे निदर्शनास आले असून अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या गुरुवारच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला आहे. आठ दिवसांत महाविद्यालय विकास समिती स्थापन करून विद्यापीठास अहवाल सादर करायचा आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ८९४ महाविद्यालयांपैकी फक्त ३५३ महाविद्यालयांत विकास समितीची स्थापना करण्यात आली असून फक्त १५० महाविद्यालयांनी समितीचा अहवाल विद्यापीठाकडे सादर केला आहे. या बाबीची गंभीर दखल घेत विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ९७ अन्वये प्रत्येक संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त, अधिकारप्रदत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त परिसंस्थामध्ये स्वतंत्र महाविद्यालय विकास समितीची (सीडीसी) स्थापना करणे अनिवार्य आहे.

MNS allowed to hold meeting at Shivaji Park ground in the wake of Lok Sabha elections
उमेदवार नसलेल्या पक्षाला ‘शिवाजी पार्क’; मनसेला सभेसाठी परवानगी
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Godrej Family split
१२७ वर्षांपूर्वीच्या गोदरेज ग्रुपचे अखेर विभाजन; भावांमध्ये अशी झाली वाटणी
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
sharad pawar raj thackeray
“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर
Raj Thackeray
ट्रिपल इंजिन सरकारला मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांना माझ्याकडून…”

हेही वाचा…अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांचे हत्याकांड, लैलाच्या सावत्र वडिलांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले

तसेच या समितीचा अहवाल विद्यापीठास ३० जून पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयात शैक्षणिक, प्रशासकीय, पायाभूत सुविधांसह महाविद्यालयाचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यासाठी, अभ्यासविषयक व अभ्यासानुवर्ती, पाठ्येतर कार्यक्रमामधील गुणवत्तेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिने महाविद्यालयास सक्षम करण्यासाठी महाविद्यालय विकास समितीची स्थापना करणे अनिवार्य आहे.