लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कडक उन्हामुळे होणारी काहिली शमविण्यासाठी थंड पेय प्यायल्याने मुंबईकरांच्या घशास संसर्ग होत आहे. घशास खवखवीमुळे त्रासात भर पडली आहे. मागील काही दिवस अशा रुग्णांच्या संख्येत ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

sangli almatti dam marathi news,
Video: सांगलीत पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीच्या विसर्गामध्ये २५ हजार क्युसेकची वाढ
How to protect your skin from common infections during monsoon Tips
पावसाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या त्रास देऊ शकतात; ‘या’ उपायांनी मिळवा लगेच आराम
What is Next of kin rule
Next Of Kin नियम काय आहे? लष्करातील या नियमात सुधारणा करण्यासाठी का होतेय मागणी?
Elephant Viral Video
जंगलात कार पाहताच हत्ती भडकला, रागात हल्ला करण्यासाठी गजराज पुढे येताच लोकांच्या किंकाळ्या अन् पुढे घडलं असं की…
Heavy rainfall causes flooding in Mumbai
प्रशासनाचे दावे पाण्यात; पहिल्या मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण; रस्त्यांवर पाणी, रेल्वे ठप्प
What do you do to prevent corrosion of a car Follow these tips
कारच्या गंज प्रतिबंधात्मक संरक्षणासाठी काय कराल? फॉलो करा ‘या’ टिप्स
Rising Temperatures, Rising Temperatures to Decrease Farmer s Income, Moody s Report, heat wave, heat wave in india, heat wave in world, heat wave Decrease Farmer s Income, Indian farmer,
उष्णतेच्या लाटांमुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात; भात, अन्नधान्यांची पिके अडचणीत येण्याची भीती
how to save in water
वाहत्या पाण्यात समूहाने अडकलात तर स्वतःसह इतरांचा जीव कसा वाचवाल? भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर प्रशिक्षण देणारा VIDEO व्हायरल!

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल थंडगार पदार्थ खाण्याकडे व शीतपेय, ताक, लस्सी आदी पिण्याकडे वाढला आहे. भर उन्हात दुपारी कामानिमित्त बाहेर पडल्याने अनेकजण लस्सी, ताक आणि इतर शीतपेये पिण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र यामुळे त्यांच्या घशाला संसर्ग होत आहे. काही जणांना घशाला सूजही येत असल्याचे निदानात स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-म्हाडातील फंजीबल चटईक्षेत्रफळ घोटाळा; आतापर्यंत मंजूर प्रस्तावांची छाननी होणार

उन्हामुळे अनेकांमध्ये पित्तप्रकोप वाढला आहे. अनेकदा पित्ताच्या वाढीमुळे घशातील खवखव वाढते. पित्त आणि थंडपेयांच्या सेवनामुळे घशाला सूज येण्याचे प्रकार वाढले आहेत. घशातील संसर्गामुळे खाताना त्रास होणे, तापाची लक्षणांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. धीरजकुमार नेमाडे म्हणाले. असे रुग्ण दिवसाला १० ते १५ रुग्ण रुग्णालयात येत आहेत. यात लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती बॉम्बे रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचे सल्लागार डॉ. मिनेश जुवेकर यांनी दिली.

निर्माणाधीन इमारतींची संख्या अधिक असल्याने वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय वाहनांची वर्दळीमुळे वायूप्रदूषणात भर पडली आहे. धुळीमुळे नागरिकांच्या घशाला संसर्ग होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट

काळजी घ्या

  • थंडपेये पिणे टाळा
  • दुपारचे उन्हात फिरणे टाळा
  • साधे पाणी प्या
  • घरातून पाणी घेऊन बाहेर पडा
  • मुखपट्टीचा वापर करा