मुंबई : मुंबई महानगरात राहणाऱ्या कोकणवासियांना आता गणेशोत्सवाची चाहूल लागली असून गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण शनिवारपासून (४ मे) सुरू होणार आहे.

कोकणवासियांसाठी होळी आणि गणेशोत्सव हे अत्यंत जिव्हाळ्याचे सण आहेत. त्या कालावधीत मुंबईस्थित कोकणवासीय मूळ गावी धाव घेतात. वेगवेगळ्या मार्गाने गावी पोहचण्यासाठी धडपड सुरू असते. यंदाच्यावर्षी ७ सप्टेंबरला गणेशचतुर्थी आहे. त्यामुळे आता अनेक कोकणवासीयांचे गावी जाण्याचे नियोजन सुरू झाले आहे. भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवसाआधी सुरु होते. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी धावणाऱ्या कोकणातील रेल्वेगाडीचे तिकीट ४ मेपासून काढता येणार आहे. गेल्यावर्षी तिकीट आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड मिनिटांत प्रतीक्षा यादी हजारांपेक्षा अधिक होती. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या गाड्यांची तिकिटे काढताना, प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली होती.

Special trains will run from Panvel to Margaon and Sawantwadi
मुंबई : पनवेल ते मडगाव, सावंतवाडी विशेष रेल्वेगाड्या धावणार
Konkankanya, Janshatabdi,
जनशताब्दी, कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजारांवर
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
How ticket reservation for trains going to Konkan ends in few moments
कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण काही क्षणांत कसे संपते?
konkan kanya express marathi news, waiting list goes to 500 marathi news, konkan ganeshotsav all ticket booked
कोकण रेल्वेची गणेशोत्सव प्रतीक्षा यादी ५०० पार, एका मिनिटात गाड्या संपूर्ण आरक्षित
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
irctc indian railways mission raftaar to enhance service train count vande bharat sleeper train speed to confirm train ticket
रेल्वेने प्रवास करण्यासाठी गुड न्यूज! प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी सुरु होणार ‘ही’ सुविधा; वाचा सविस्तर

हेही वाचा – वांद्रे सरकारी वसाहतीतील कर्मचाऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार, मालकी हक्काने घरे देण्याची मागणी

हेही वाचा – मुंबई : परिचारिकेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ भाभा रुग्णालयात आंदोलन

मुंबईतून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ७ मे रोजीपासून सुरू होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी हरतालिका आहे. त्या दिवशीचे तिकीट आरक्षण ९ मेपासून सुरू होईल. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी, ऋषिपंचमी ८ सप्टेंबर रोजी, गौरी विसर्जन १२ सप्टेंबर रोजी आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशीचे रेल्वेगाड्यांचे तिकीट अनुक्रमे १० मे, ११ मे, १५ मे आणि २० मे रोजी काढता येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आरक्षण करावे. तिकीट आरक्षण रेल्वे स्थानक किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून किंवा अॅपवरून करू शकतात, असे आवाहन कोकण विकास समिती यांच्याकडून केले आहे.