उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्रात रिक्षा परवान्यांचे वाटप केले जाणार असून या रिक्षा रस्त्यावर आल्यास सरळ जाळून टाका, या राज ठाकरेंच्या विधानाचे पडसाद गुरूवारी विधिमंडळ अधिवेशनात उमटले. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. याठिकाणी अशाप्रकारे कायदा तोडण्याची भाषा करणे योग्य नाही. कायदा तोडल्यावर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिला. याशिवाय, भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला आहे. इतकेच वाटत होते तर त्यांनी गेल्या दहा वर्षांत मराठी जनतेसाठी काय केले, असा सवाल काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2016 रोजी प्रकाशित
कायदा तोडणाऱ्यांवर कारवाई करू; राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राम शिंदे आक्रमक
महाराष्ट्रात कायदा तोडण्याची भाषा करणे योग्य नाही
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-03-2016 at 10:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram shindes reaction on raj thackerays speech