उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यासह अभिनेत्यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्या या भेटींनंतर मुंबईमधील चित्रपट उद्योग उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या असतानाच याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

हेही वाचा – “थेट शूट करण्याऐवजी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो,” सुषमा अंधारेंच्या विधानामुळे खळबळ

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?

संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत बॉलीवूड आणि मुंबई हे अतूट नातं असल्याचे म्हटलं आहे. तसेच चित्रपटसृष्टीची सुरुवात दादासाहेब फाळके यांनी केली असून चित्रपट उद्योग हा काही हलवा नाही, जो डब्यात घालून नेता येईल. त्यामुळे चिंता नसावी, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

योगी अदित्यनाथ यांनाही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, याबाबत काल (५ जानेवारी) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “मुंबई ही मुंबई आहे. हे शहर अर्थभूमी आहे. तर उत्तर प्रदेश राज्य हे धर्मभूमी आहे. या दोघांचा सुंदर संगम होऊ शकतो. मुंबईतील फिल्मसिटी घेऊन जाण्याचा आमचा कोणताही विचार नाही. मात्र आम्ही आमची स्वत:ची फिल्मसिटी उभारत आहोत,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले होते.