जातीयवादाचे राजकारण सुरू झाल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कल्पना होती. म्हणून त्यांना जातिभेदाच्या भिंती समूळ नष्ट करायच्या होत्या. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. मात्र भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळाच्या तुलनेत आज समाजात जातिव्यवस्थेबाबत अधिक जाणिवा आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष जातीच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत, अशी खंत खासदार शशी थरूर यांनी ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’च्या चौथ्या दिवशी आयोजित एका सत्रात व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाटा लिटरेचर लाइव्ह’मध्ये शनिवारी एका सत्रात खासदार शशी थरूर यांच्या ‘आंबेडकर अ लाइफ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार राघव बहल उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चर्चासत्र पार पडले. त्या वेळी शशी थरूर बोलत होते. सध्या सुरू असलेल्या जातीयवादाच्या राजकारणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoor regrets that every party is ahead in seeking votes in the name of caste amy
First published on: 13-11-2022 at 02:04 IST