मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्णाटक बँके’तून करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्याच काळात झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकारी ठेवी खाजगी बँकामध्ये ठेवण्याचे धोरणही ठाकरे सरकारच्याच काळातील असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्णाटक बँके’तून करण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असताना फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. दोन वर्षांपूर्वी येस बॅक व अन्य खासगी बँकेतील घोटाळे उघडकीस आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडी सरकारने मार्च २०२० मध्ये शासकीय ठेवी, निधी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्याचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे तर सर्व सरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि महामंडळे आदींनी खाजगी बँकेतील खाती बंद करून बँकेचे सर्व व्यवहार राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातूनच करावेत असे आदेश देत त्यासाठी ११ शासकीय-राष्ट्रीयकृत बँकांची यादीही जाहीर केली होती. मात्र काही खाजगी बँकाच्या दबावानंतर वर्षभरातच हे धोरण गुंडाळण्यात आले आणि मार्च २०२१पासून पुन्हा एकदा खासगी बँकांना मर्यादित प्रमाणात परवानगी देण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी महाविकास आघाडी सरकारनेच अ‍ॅक्सिस, येस बँकेसह १५ खाजगी बँकांना वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी परवानगी दिल्याची माहिती वित्त विभागातील उच्चपदस्थाने दिली.

BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
CM Siddaramaiah
CM Siddaramaiah : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अडचणीत वाढ; MUDA जमीन गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
MP Rahul Shewale defamation case Uddhav Thackeray Sanjay Raut defamation case
खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश

कर्णाटक बँकेने ८ डिसेंबर २०२१ रोजी अर्ज केला होता आणि २१ डिसेंबरला करार करण्यात आला. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने २१ जून २०२२ रोजी अर्ज केला आणि त्याच दिवशी करार करण्यात आला. जम्मू आणि काश्मीर बँकेने अर्ज केल्यावर लगेचच करार करण्यात आला होता. यावरून महाविकास आघाडी सरकारने अर्ज आल्यावर किती तत्परता दाखविली हे सिद्ध होते, असेही सांगण्यात आले.

वित्त विभाग या सगळय़ा गोष्टी आरबीआयच्या नियमानुसार आणि निर्देशानुसार करत असतो. एखाद्याला वाटले म्हणून द्यायचे किंवा एखाद्याला वाटले म्हणून द्यायचे नाही, असा त्याचा कुठलाही अर्थ नसतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे. कर्णाटक बँक असेल किंवा उत्कर्ष फायनान्स असेल या बँकांची नावे काहीही असली तरी त्या वित्तिय संस्था आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांचा दावा धादांत खोटा – पवार

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन ‘कर्णाटक बँके’तून करावे, यासाठीचा शासन निर्णय ७ डिसेंबरला निघाला आहे. याचा अर्थ एका दिवसांत नस्ती फिरली आहे, असा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.  याबाबत माहिती अधिकारात माहिती गोळा करणार असून अधिवेशनात त्याबाबत सभागृहात बोलणार असल्याचे ते म्हणाले. या सरकारच्या काळातच हा निर्णय झाला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलत आहेत, असा आरोप पवार यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात याबाबतचा प्रस्ताव आला होता. मात्र त्यास आम्ही विरोध करीत प्रस्ताव नाकारला होता. असे असताना या सरकारने एका दिवसात निर्णय फिरवला असेही पवार म्हणाले.

कर्णाटक बँक, जम्मू अ‍ॅन्ड काश्मीर आणि उत्तर प्रदेशातील उत्कर्ष बँकेला सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची परवानगी देण्याचा निर्णय आमचे सरकार येण्यापूर्वीच वर्षभरापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला आहे. अजित पवारांनी नीट माहिती घेतली असती तर त्यांनी सरकारवर आरोप केले नसते. 

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री