मुंबई : मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावरील शेवटच्या इगतपुरी – आमणे (ठाणे) टप्प्याचे काम अत्यंत आव्हानात्मक आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल असे जाहीर केले आहे. आतापर्यंत डिसेंबर २०२३ मध्ये शेवटचा टप्पा पूर्ण होईल असे सांगण्यात येत होते.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किमी लांबीचा असून नागपूर – भरवीरदरम्यानचा ६०० किमी लांबीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील भरवीर – इगतपुरी आणि चौथ्या टप्प्यातील इगतपुरी – आमणेदरम्यानच्या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरू आहे. भरवीर – इगतपुरी टप्प्याचे काम दिवाळीच्या आसपास पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर तात्काळ हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाईल, असे एमएसआरडीसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kalyan, signal malfunction, Central Railway, service disruption, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Kasara, Karjat, local trains, commuter chaos, railway stations, passengers, Dombivli, rain, road traffic, transportation, thane news, marathi news, kalyan news, Central railway news, loksatta news,
कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त
best buses, fleet of buses, BEST initiative, fleet of buses owned by BEST in the BEST initiative is decreasing, Best bachao Campaign, Brihanmumbai Electricity Supply and Transport Undertaking,
७५ वर्षापासूनची बेस्ट उपक्रमाची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाचवण्यासाठी ‘बेस्ट बचाओ’कडून पुढाकार
Shaktipeeth Expressway, nagpur goa Shaktipeeth Expressway, Shaktipeeth Expressway facing protest, Land Acquisition in Shaktipeeth Expressway, Environmental Impact of Shaktipeeth Expressway, Financial Burden, vicharmanch article,
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील खनिजे वाहून नेण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग?
haji ali Mumbai , haji ali to worli sea link marathi news
सागरी किनारा मार्गावरील हाजी अली – वरळी टप्पा लवकरच सुरू होणार, वांद्रे – वरळी सागरी सेतूसाठी अद्याप प्रतीक्षा
About 700 to 800 local trains were canceled on the first day of the week due to Central Railway mismanagement Mumbai
मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराने आठवड्याची सुरूवात; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे ७०० ते ८०० लोकल फेऱ्या रद्द
nashik Mumbai journey marathi news
खड्डे, वाहतूक कोंडीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाला आठपेक्षा अधिक तास, महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सोमवारी मंत्रालयात बैठक
Mumbai-Goa highway is currently in a major state of disrepair in the Wadkhal to Indapur stretch near Lonere
विश्लेषण : पहिल्या पावसातच चाळण… मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दैवाचे दशावतार कधी संपणार?
mmrda to construct tunnel from vasai fount hotel naka to gaymukh thane
वसई-ठाणे ‘भुयारी’ प्रवास; भुयारी मार्ग, उन्नत रस्त्याच्या २० हजार कोटींच्या प्रस्तावास मंजुरी

दरम्यान, चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील इगतपुरी – आमणेदरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी डिसेंबर २०२३चा मुहूर्त जाहीर करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी – भरवीर महामार्गाच्या लोकार्पणाच्या वेळी २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेवटचा टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल असे जाहीर केले होते. तर, एमएसआरडीसीनेही डिसेंबरमध्ये काम पूर्ण होईल, असे अनेक वेळा स्पष्ट केले होते.
चौथा टप्प्याचे काम मे २०२४ मध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

शेवटच्या टप्प्यात तब्बल १२ बोगदे..

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यात तब्बल १२ बोगदे असून यातील एक बोगदा आठ किमी लांबीचा आहे. तर, उर्वरित ११ बोगदे सरासरी एक किमी लांबीचे आहेत. हे बोगदे कसारा घाटातून जाणार असून त्यामुळे कसाराघाट अगदी पाच-सहा मिनिटांत पार करता येणार आहे. त्याच वेळी या टप्प्यात १६ ‘व्हायाडक्ट’चाही (उंच पूल, दरीवरून रेल्वे मार्गावरून जाणारा रस्ता) समावेश आहे. नाशिकमधील वशाळा येथील एका दरीवरून महामार्ग जाणार असून येथील पुलाचे खांब तब्बल ८४ मीटर म्हणजेच २७५ फूट उंच आहेत. हे काम सर्वाधिक आव्हानात्मक आहे. पावसाळय़ात या भागात काम करणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे सध्या तेथील काम बंद आहे. पावसाळय़ानंतरच या टप्प्यातील काम वेग घेईल.