लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर द्वितीय वर्ष एम. ए. तृतीय सत्राच्या परीक्षेत चुकीचे प्रश्न आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चक्क ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ या विषयाचे प्रश्न आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. केवळ विद्यापीठाच्या चुकीमुळे दुपारी २.३० ते सायंकाळी ७ असे तब्बल साडेचार तास परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना थांबावे लागले.

decreasing students in coaching capital kota
विश्लेषण : ‘कोटा फॅक्टरी’ला घरघर? कोचिंग शहरातील विद्यार्थी संख्या घटण्याची कारणे कोणती?
11th admission process Even after the third regular round 1 lakh students have no college Mumbai
अकरावी प्रवेश प्रक्रिया :तिसऱ्या नियमित फेरीनंतरही १ लाख विद्यार्थ्यांना महाविद्यालय नाही
Case of NEETUG paper leak Four more students arrested in Bihar
बिहारमध्ये आणखी चार विद्यार्थ्यांना अटक; ‘नीटयूजी’ पेपर फुटीचे प्रकरण, पाटणा ‘एम्स’मधील वसतिगृहाच्या खोल्याही ‘सील’
Students of Mumbai Municipal Corporation schools
मुंबई: पालिका शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित
bed, CET, Admission, competition,
बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस, सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
27 female students were illegally kept on rent in the girls hostel of Government Engineering College Chandrapur
कमालच आहे राव… प्राध्यापिकांनी वसतिगृहात चक्क २७ विद्यार्थिनींना भाड्याने ठेवले
Mumbai 11th Grade Admissions, 11th Grade Admissions Second List, 11th admission Second List to be Released on 10th July, Over 1 Lakh Students Still Awaiting Admission, education news, marathi news, latest news, loksatta news
अकरावी प्रवेश प्रक्रिया : दुसरी प्रवेश यादी जाहीर, २० हजार ३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय
UGC, university grant commission, UGC Warns Higher Education Institutions, Adhere to Examination Schedules and Timely Issuance of Certificates, UGC Warns Institutions for Examination Schedules and Timely Issuance of Certificates, education news, loksatta news, latest news,
परीक्षा वेळेत घ्या, अन्यथा… युजीसीचा उच्च शिक्षण संस्थांना इशारा काय?

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पदव्युत्तर द्वितीय वर्ष एम.ए. तृतीय सत्र परीक्षा २२ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात येत आहे. शुक्रवार, १ मार्च रोजी ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ (फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया) या विषयाची परीक्षा होती. मात्र प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ (इंडियाज नेबरहूड पॉलिसी) या विषयाचे होते. प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर सायंकाळी ४.३० वाजता विद्यार्थ्यांना सुधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे, अशी खंत एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

आणखी वाचा-राज्यभर ११ हजारांहून अधिक घरे पडून, म्हाडाच्या शिल्लक घरांची खासगी संस्थेमार्फत विक्री

‘विद्यार्थी मेहनतीने अभ्यास करीत असतात, परंतु सर्व अधिकारी व शिक्षक झोपेत प्रश्नपत्रिका तयार करीत आहेत का, ‘बारकोड’विना परीक्षा घेतल्यानंतरही प्रशासनाला जाग कशी येत नाही. आता कुलगुरूंनी परीक्षेच्या कामकाजात गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे’, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी व्यक्त केले.

तांत्रिक कारणास्तव चुकीची प्रश्नपत्रिका

विद्यार्थ्यांना काही तांत्रिक कारणास्तव ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयाचा परीक्षेला ‘भारताचे शेजारील राष्ट्रांशी धोरण’ या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाकडून अर्ध्या तासाने महाविद्यालयांना सुधारित प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळही देण्यात आला, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.