चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर: महाराष्ट्रात मागील तीन वर्षात (२०२० ते २०२२) भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या तब्बल ११ लाख ९ हजार ७६० घटनांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही सरकारी आकडेवारी आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रकरणांची नोंदच होत नसल्याने ही संख्या अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Hajj pilgrims, app, devotees,
हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा
Navpancham Yog 2024
Navpancham Yog 2024 : १०० वर्षानंतर गुरू अन् केतू निर्माण करणार नवपंचम योग, ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
loksatta analysis conflict between the majority maitei and minority kuki tribes in manipur
विश्लेषण : मणिपूर हिंसाचाराची वर्षपूर्ती… शाश्वत शांतता नांदणार कधी? 
मुलगी किंवा पत्नी ते जागरूक नागरिक; कसा झाला महिला मतदारांचा प्रवास?
corona virus cases decreased
करोना विषाणू आजही अस्तित्वात; मग त्याचा धोका कमी होऊन संक्रमितांची संख्या कशी घटली?
malaysia development berhad scandal
‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)
loksatta analysis causes of forest fires in uttarakhand
विश्लेषण : उत्तराखंडमधील वणवा आटोक्यात का येत नाही? वणव्यांची समस्या जगभर उग्र का बनतेय?
mangal gochar mars will make ruchak rajyog
एका वर्षानंतर मंगळ ग्रह निर्माण करणार रुचक राजयोग! या राशीच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा!

केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २०२०- २०२२ या तीन वर्षात तब्बल ११ लाख ९ हजार ७६० घटना नोंदवण्यात आल्या आहेत. २०२० मध्ये ५ लाख ८ हजार ६२० लोकांना, २०२१ मध्ये २ लाख १० हजार २६२ तर २०२२ मध्ये ३ लाख ९० हजार ८७८ लोकांना भटक्या श्वानांनी चावा घेतला. २०२१ च्या तुलनेत २०२२ या संख्येत १ लाख ८० हजार ६१६ ने वाढ झाल्याचे निदर्शनास येते. २०२२ मध्ये संपूर्ण देशात भटके श्वान चावण्याच्या घटनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यानंतर तामिळनाडूचा (३,६४,२१०) चा क्रमांक आहे.

हेही वाचा… अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन विभागाने प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, २००१ (२०१० मध्ये सुधारित) कायदा केला असून त्याची अंमलबजावणी स्थानिक प्राधिकरणांना करावयाची आहे. यात प्रामुख्याने भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण व त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करणे यावर अधिक भर देण्यात आला आहे. २०२३० पर्यंत भटका कुत्रा चावल्यामुळे होणाऱ्या रेबीजचे निर्मूलन करण्यासाठी विशेष कार्ययोजना तयार करण्यात आली आहे. या उपाययोजनांनतरही भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या घटनांमध्ये वर्षभरात वाढ नोंदवली गेली आहे.