नागपूर: शनिवारी नागपुरात आलेल्या पुरामुळे शहराच्या काही भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासनाने केलेल्या सर्वेक्षणातून जे आकडे पुढे आले त्यावरून पुराची व्यापकता किती होते हे स्पष्ट होते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुरामुळे नागपूर शहरातील १५ हजार कुटुंबे बाधित झाली. ११,२३८ घरे, ३०० दुकाने व टपऱ्यांना फटका बसला.

हेही वाचा >>> व्हिडीओ गेम खेळणाऱ्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५ घरे पूर्णत:तर १४९ घरांचे अंशत: नुकसान झाले. नदी-नाल्यावरील ३ पूल खचले, विविध ठिकाणी एकूण १०,३०१ मीटर नाला भिंत कोसळली. ३७,१९० मीटर रस्त्याचे नुकसान झाले आहे. १४ गुरांचे मृत्यू झाला. सर्वेक्षण करण्यासाठी १४५ कर्मचाऱ्यांचे एकूण ५० पथक तयार केल्या असून ७४०० घरांचे पंचनामे झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६१४२ हेक्टरमध्ये पीकांचे तर ६०० घरांचे नुकसान झाले.