गोदिया : कावडमधील तांब्यात नदीचे पाणी भरत असताना तोल गेल्याने तरुण बाघ नदीत बुडाला. ही घटना आज, रविवारी बाघ नदी येथे घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – वर्धा: ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या सरपंचास सश्रम कारावास
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
रामनगर, गोंदिया येथे राहणारा १९ वर्षीय व्यंकटेश रिंकू स्वामी रविवारी सकाळी आपल्या साथीदारांसह बाघ नदीवर गेला होता. कावडमध्ये पाणी भरत असताना तोल गेल्याने तो नदीत पडला. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस नदीवर पोहोचले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने व्यंकटेशचा शोध सुरू आहे. बाघ नदीचा प्रवाह जास्त असल्याने शोध पथकाला अडचणी येत आहेत. या घटनेमुळे इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.