वर्धा: सेवाग्राम आश्रम देश विदेशातील पर्यटक तसेच गांधी अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र या परिसरातील एक वास्तू तब्बल दीड महिने बंद ठेवण्यात आली होती. ती आता खुली करण्यात आली आहे.

या आखरी निवासचे खास ऐतिहासिक मूल्य आहे. या निवासात महात्मा गांधी सहा महिने राहले होते. २५ ऑगस्ट १९४६ ला गांधीजींनी याच निवासातून दिल्लीला प्रयाण केले होते ते परत न येण्यासाठी. म्हणून हा आखरी निवास ओळखला जातो. १९३६ साली गांधीजीनी आश्रमाची स्थापना केली होती. येथे बापू कुटी व अन्य निवास आहेत.

Akkalkot, guru purnima, devotees,
अक्कलकोटमध्ये गुरूपौर्णिमेसाठी लाखाहून जास्त भाविक दाखल
Tuljabhavani temple, file missing case,
तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरण : जुना अहवाल दडवून नवी चौकशी समिती, संशयिताच्या हाती मंदिर आस्थापनेचा कारभार
Chandrapur Jail, Hindu-Muslim unity,
‘हे’ कारागृह दोन दिवस राहते सगळ्यांसाठी खुले, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
municipal corporation approved fund for road work
कोल्हापुरातील १०० कोटी रस्ते कामातील सावळा गोंधळ सुरूच
Panvel, 1000 Trees Planted by Shri Members, 1000 Trees Planted by Shri Members in panvel, Nature Conservation Drive, Pale Budruk Village, Annual Nature Conservation Drive, loksatta news,
श्री सदस्यांचे पनवेलमध्ये निसर्ग संवर्धन
nashik eco friendly cycle wari marathi news
पर्यावरणस्नेही सायकल वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान
cyclists Foundation organized 350 km cycle ride from Nashik to Pandharpur from July 5 to 7 on occasion of ashadhi ekadashi
पंढरपूरमध्ये राज्यभरातील सायकलपटूंचा रिंगण सोहळा; नाशिक-पंढरपूर सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग
150th birth anniversary of Chhatrapati Shahu Maharaj by Dr Babasaheb Ambedkar Research and Training Institute BARTI
सचिवांच्या नातेवाईकाला पावणेदोन कोटींचे कंत्राट! शाहू महाराज जयंतीचा नियोजित कार्यक्रम असतानाही तातडीची निविदा

हेही वाचा… ५३ हजार १३६ कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इथल्या काही आश्रमाची दुरुस्ती केल्या जाते.आखरी निवासला पारंपरिक पद्धतीनेच डागडुजी केल्या जाते. माती, कुड, फाटे, बांबू, बोऱ्या, कवेलू असे साहित्य वापरल्या जात असते. अत्यंत काळजीपूर्वक त्याचे जतन होत आहे. हे संपूर्ण कार्य आश्रमातील शंकर वाणी, रामभाऊ काळे, जानराव काळे, नामदेव बघेकर, सुनील फोकमारे, नथू झोरे, सुधाकर खडतकर, जयश्री पाटील आदी सहकाऱ्यांनी पूर्ण केले. चार दिवसांपूर्वी आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांनीही आखरी निवासला भेट देत इतिहास समजून घेतला होता.