लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी गडकरींना पराभूत करण्यासाठी भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी विरोधकांना रसद पुरवली, अशी टीका केल्याने भाजपचे स्थानिक नेते संतप्त झाले आहेत. त्यांनी अत्यंत खालच्या स्तरावर राऊत यांच्यावर टीका केली आहे.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

संजय राऊत यांचा मेंदू सडका (भंगार) आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत स्वत:च्या वर्तमानपत्रात उलटसुलट लिखाण करून ते स्वत:चे महत्त्व वाढवत आहेत. गडकरी, फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून लोकसभा निवडणूक लढवली, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>एमपीएससी परीक्षेच्या पद्धतीत २०२५ पासून बदल; उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर गडकरींविरोधात निवडणूक लढणारे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी मला कोणी रसद पुरवू शकत नाही, असे खडेबोल राऊत यांना सुनावले. त्यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे व न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत यांनी केलेल्या आरोपांबाबत पुरावे द्यावेत, पुराव्याशिवाय काहीही बोलू नये, असे ठाकरे म्हणाले.