काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ वाशीम जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी दाखल होत आहे. त्याअनुषंगाने राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंडळी या यात्रेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात मुक्कामी येणार आहेत. त्यांच्या निवासासाठी वाशीम शहरातील व इतर ठिकाणच्या सर्वच्या सर्व हॉटेल्स बुक केले आहेत. उर्वरित हॉटेल्स देखील बुक होणार आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : भारत जोडो’ यात्रेकरिता उद्या दुचाकी मिरवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ जिल्ह्यात दाखल होत असून काँग्रेसच्या वतीने नियोजनाची कडेकोट व्यवस्था करण्यात येत असून बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत. राहुल यांच्यासोबत असलेल्या मान्यवरांची स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र, जिल्ह्याबाहेरील काँग्रेस नेत्यांच्या निवासासाठी वाशीम शहरातील एवेंटो, व्यंकटेश, वाटाणे लॉन तसेच इतर हॉटेल्स व मंगल कार्यालये बुक होत आहेत. याशिवाय कारंजा, मंगरूळपीर, मनोरा व इतर शहरातील सर्वच्या सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालये बुक करण्यात येत असून हॉटेल व्यवसाय तेजीत आला आहे. लोकांची संख्या वाढल्यास काँग्रेसचे सभापती निवासस्थान येथेही राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून करोना महामारी असल्याने हॉटेल व्यवसाय मंदावला होता. परंतु, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील हॉटेल्स व्यवसाय तेजीत आला आहे.