बुलढाणा:  फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात  आलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्याने उत्तम निकालाची  परंपरा यंदाही कायम राखली! बारावी परीक्षेदरम्यान  कॉपी मुक्त अभियानाची  कडक अमल बजावणी करण्यात आली.बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५. १६ टक्के लागला असून  जिल्हा अमरावती विभागात द्वितीय क्रमांकावर  आहे. केवळ ०.४८ टक्क्यानी बुलढाणा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर (किंचित ) घसरला  आहे. त्यामुळे ९५. ६६ टक्के निकालासह वाशीम जिल्हा अमरावती विभागात अव्वल ठरला आहे.

इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी, ५ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याने ९५. १८ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला  आहे. वाशीम  जिल्हा ९५. ६६ टक्केसह ‘खिलाडी नंबर वन ‘ठरला आहे. या तुलनेत अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्याची टक्केवारी ८५ ते ९१ टक्के दरम्यान आहे. यामुळे अमरावती विभागीय मंडळाच्या निकालात घसरण झाली आहे.

फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी नवीन व पुरवणी परीक्षा देणारे (रिपीटर ) मिळून ३५, ७८४ विध्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३५ हजार ५५० विधार्थी परीक्षेला बसले. त्यातील ३३ १८३ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९५. १८ टक्के लागला आहे.  उत्तीर्ण मध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी जास्त आहे. विज्ञान शाखेच्या विध्यर्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे ९८. ८२ आहे. कला शाखा ८८. ५७, ९३, व्यावसायिक (व्होकेशनल) ची टकेवारी ८७.६६ इतकी आहे.

मेहकर तालुका आघाडीवर

दरम्यान तालुकानिहाय  निकालात मेहकर तालुक्याने  ९८. ४१ टक्के निकालासह जिल्ह्यात बाजी मारली आहे.  आदिवासी बहुल संग्रामपूर तालुका ९८. ३८ टक्के निकालसह जिल्ह्यात द्वितीय  आहे. ही कौतुकास्पद बाब ठरावी. एकूण तेरा पैकी इतर तालुक्याचे निकाल पुढीलप्रमाणे आहे.  बुलढाणा ९७. २२ टक्के, मोताळा ९२. ५७,   चिखली  ९७. ७०,   देऊळगाव राजा ९५. ७७,  सिंदखेड राजा ९५. ४१, लोणार ९२. ९७,    शेगाव९३. २७ टक्के,   नांदुरा ९२. ४६, मलकापूर८८. ४३ जळगाव जामोद ९५. ७३ टक्के. मलकापूर वागळता सर्वच तालुक्याची टक्केवारी ९२. ४६ टक्के पेक्षा जास्त आहे.

दरम्यान यंदा जिल्हा प्रशासनाने कॉपी मुक्त अभियांनाची कडक अंमलबाजवणी केली होती. जिल्ह्यात भरारी पथक, परीक्षा केंद्रात  बैठे पथक, सर्व परीक्षा केंद्रात सिसिटीव्ही यंत्रणा, कडक पोलीस बंदोबस्त, परीक्षा केंद्र परिसरात जमाव बंदी असा बंदोबस्त होता. मात्र या उप्परही बुलढाणा जिल्ह्याने निकालाची उज्ज्वल परंपरा  कायम राखली आहे. अमरावती विभागात प्रथम वा किमान दुसऱ्या क्रमांकावर राहायची अलिखित परंपरा  जिल्ह्याने कायम राखली. यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात  जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण आहे.