चंद्रपूर : दोन दिवसांत दोन महिलांचे बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात ब्रम्हपुरी वन विभागाला यश आले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाल्यानंतर राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर वन विभागाने या वाघाला जेरबंद करण्याची मोहीम राबवली.

हेही वाचा >>> ‘स्वराज्यरक्षक की धर्मवीर?’ माझ्यासोबत वादविवाद करा, हरणाऱ्याने…’, मिटकरींचे विरोधकांना खुले आव्हान

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
After the Kanker encounter in Chhattisgarh the police claim that the Naxalites supply system has been hit
नक्षलवाद्यांच्या पुरवठा यंत्रणेला धक्का; छत्तीसगडमधील कांकेर चकमकीनंतर पोलिसांचा दावा 
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत शुक्रवार ३० व शनिवार ३१ डिसेंबरला शेतात काम करत असलेल्या नर्मदा प्रकाश भोयर व सीताबाई रामाजी सलामे या दोन महिलांचा वाघाने बळी घेतला. या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. तोरगांव बुज. येथे तर या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. जोपर्यंत वाघाला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी वनखात्याला दिला होता. या घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री मुनगंटीवार यांनी वनविभागाला वाघाला तत्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवार, १ जानेवारी रोजी तोरगाव बुज. येथे वाघाला जेरबंद करण्यात आले. वाघ जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. व्याघ्र हल्ल्याच्या घटना पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, जंगलात रात्री जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.