नागपूर : कॉंग्रेसने घराणेशाही केली आणि राष्ट्रवादी पक्ष ही सरदारांची फौज आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही. भाजपाने देशाला मोठे नेतृत्व दिल्यामुळे आमच्या पक्षात सामान्य कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. त्यामुळे रोहीत पवार नुकतेच राजकारणात आले आहे, त्यामुळे त्यांनी भाजपावर बोलण्यापूर्वी आपल्या पक्षाची परंपरा आणि संस्कृती बघावी, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे, मात्र समाजाच्या समस्या मी पत्र लिहून पाठवलेल्या आहे, कोणीतरी जाणीवपूर्वक राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम करत आहे. गोपीचंद पडळकर काय म्हणाले माहिती नाही, मात्र व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली आहे. महिला अरक्षणामुळे काँग्रेस आता बॅकफूटवर गेले, केंद्र सरकारने ऐतिहासिक महिला आरक्षण दिले आहे, त्यामुळे काँग्रेसचे नेते काहीतरी बोलत गोंधळ निर्माण करतात, मात्र त्यांना महत्त्व देण्याची गरज नसल्याचे बावनकुळे म्हणाले.

Like British Congress only thoughts of looting country modi criticism in phohadevi washim
काँग्रेस इंग्रजांप्रमाणेच देशाला लुटण्याचा विचार करते….बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक….पोहरादेवीत पंतप्रधानांचा घणाघात….
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
Congress complains to Governor about law and order neglecting farmers print politics news
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कायदासुव्यवस्था ढासळली; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार
sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण

हेही वाचा – भारतात गोसेवा व गोरक्षण समजून सांगावे लागत आहे, हेच वेदनादायी; संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची खंत

हेही वाचा – ऋषिपंचमीनिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; साडेचारशे दिंड्या दाखल

काँग्रेसच्या काळात महिला आरक्षणाचा कायदा १२ वेळा वापस पाठवला. राज्यसभेत मंजूर झाल्यावर वापस पाठवणाऱ्या काँग्रेसला महिला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, काँग्रेस तर महिला आरक्षणविरोधी असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.