राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा केला होता. तसेच यासंदर्भातील एक व्हिडीओ दाखवत हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आज महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यात आलं आहे. दरम्यान, याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – माहीमच्या समुद्रातल्या ‘त्या’ बांधकामावर प्रशासनाची तोडक कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांनंतर पालिकेचं मोठं पाऊल!

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
violence in bengal before election
NIA च्या पथकावर हल्ला, पश्चिम बंगालमधील वातावरण तापले; वाचा याआधीच्या निवडणुकांमधील हिंसाचाराचा इतिहास
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

अनेक गोष्टी सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. पण राज ठाकरे यांनी काल माहीममधील बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला आणि शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. त्यासाठी मी दोघांचेही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सरकारकडून यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं बांधकाम पाडण्यात आलं होतं. आज माहीममध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. या पद्धतीने राज्यात जिथेही अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण काढले पाहिजे. शिवाय समाजात कुठेही वैर निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो दोघेही संवेदनशील नेते आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Mahim Dargah : राज ठाकरेंनी दाखवलेल्या ‘त्या’ व्हिडीओवर माहिम दर्गा ट्रस्टची प्रतिक्रिया; “ती जागा ६०० वर्षे जुनी, आम्ही तिथे…”

दरम्यान, राज ठाकरेंनी माहीममधील बांधकामासंदर्भात केलेलं विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारं आहे, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे, यासंदर्भातही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होईल, असं वाटत नाही. याउलट त्यांनी त्यांच्या भाषणात जावेद अख्तर यांचं कौतुक केलं. तसेच भारताचं संविधान मानणारा मुस्लीम आम्हाला हवा आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही, असे ते म्हणाले.