गडचिरोली : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी उद्धव ठाकरेंचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. पण त्यांना कारागृहात जाऊन आलेल्या संजय राऊत यांचा सहवास अधिक आवडतो. आमच्या पाठीत अविश्वासाचा खंजीर खुपसला नसता तर ते आज अमेरिकेचे प्रमुख जो बायडन यांच्या बाजूला बसले असते, अशी टीका भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

हेही वाचा – पिचकारीबहाद्दरांकडून पाच महिन्‍यांत ७.८१ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेची कारवाई

praniti shinde
“केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट”, नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र; म्हणाल्या, “आम्ही शिक्षणमंत्र्यांचा…”
vilas lande letter, vilas lande, Sharad Pawar,
पिंपरी-चिंचवड: शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवारांच्या माजी आमदाराचे भाजपा श्रेष्ठीला पत्र
A letter from the people of Nagpur on the occasion of Devendra Fadnavis birthday nagpur
“उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण नागपूरकरांना वाळीतच टाकले…” देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राची सर्वत्र चर्चा
Narendra Modi In Radhika- Anant Ambani Wedding
नरेंद्र मोदी यांनी नीता अंबानींना वाकून केला नमस्कार? फोटो पाहून लोक म्हणतात, “मालकिणीसमोर तर..”, वाचा खरं काय
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
mamata banerjee on samvidhaan hatya diwas
संविधान हत्या दिन: अमित शाहांच्या घोषणेबाबत प्रश्न विचारताच ममता बॅनर्जी काही क्षण थांबल्या, नंतर म्हणाल्या…
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
Akshata Murty trolled over her Rs 42,000 dress
अक्षता मूर्ती ४२ हजारांचा ड्रेस परिधान केल्याने ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ऋषी सुनक निरोपाचं भाषण देताना…”

हेही वाचा – चोरीच्या मुरूमाचा जप्त ट्रॅक्टर तलाठी कार्यालयातून पळवला, अट्टल चोरट्यांचा प्रताप

जनसंपर्क अभियानासाठी गडचिरोली येथे आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या की, प्रत्येकवेळी आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. शरीरावर व्यंग केले जात आहे. आमचे नेते संयमी आणि सुसंस्कृत असल्याने ते त्या पातळीवर जाऊन प्रत्युत्तर देत नाहीत. पण आमचा बांध तुटतो आहे. वारंवार उद्धव ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव हे तीन जोकर आमच्या नेत्यांवर त्यांच्या शरीरावर व्यंग करीत आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर ज्याप्रकारची टीका केली गेली, तो समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. सरकारच्या धोरणावर किंवा एखाद्या निर्णयावर टीका करणे ठीक, पण नेत्यांवर अशापद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन काहीही बोलणे हे आम्ही आता खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.