वाशीम : संजय राठोड यांच्यावर संकट आले तेव्हा काही लोकांनी हात वर केले. मात्र, बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी उभा राहिला. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची पाठराखण केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणातून सावरण्यास मदत केल्याचे पोहरादेवी येथे सांगितले.

हेही वाचा – “कोश्यारी यांनी राज्यपाल म्हणून घेतलेल्या निर्णयाची चौकशी व्हावी”; शरद पवार यांचे मत

हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; चर्चा मात्र उच्च न्यायालयाने दोनदा बजावलेल्या नोटीसची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंदात सर्व सोबत येतात, संकटात कोणी नसतो. मात्र, अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम बंजारा समाजाने केल्यामुळेच संजय राठोड पुन्हा मंत्री म्हणून तुमच्या समोर उभे आहेत, अशी पुष्टी मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जोडली. संजय राठोड संकटात असताना त्यांच्याशी आणि त्यांच्यावर आलेल्या संकटांशी आमचे काय देणे-घेणे, असा विचार आम्ही केला नाही. तो आमचा आहे. आम्ही आपले आहोत. आपल्यात जिव्हाळा आहे, म्हणूनच आज पोहरादेवी येथे जनसागर उसळला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.