अकोला : गेल्या दहा वर्षात राष्ट्राची प्रगती सातत्याने खुंटली. देशात अराजकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज येथे केली. अकोला मतदारसंघातील पातूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अभय पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नतीकोद्दिन खतिब, आमदार नितीन देशमुख, राष्ट्रीय सचिव आशीष दुवा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाला कंगाल करण्याचे षडयंत्र आखले. अनेक प्रकारच्या माध्यमातून ते कट कारस्थान केले जात आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील महागाई, भ्रष्टाचाराने जागतिक पातळीवर भारताची नाचक्की केली, असा आरोप वासनिक यांनी केला. ‘४०० पार’चे आकडे दाखवत असताना दुसरीकडे मोदी सरकारचा विशेष पराभव दिसून येत आहे. भाजपकडील गर्दी ओस पडली. यामुळे सर्वत्र भाजपचे धाबे दणाणले आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका
Devendra Fadnavis in alandi
आळंदी: देशात अराजकता निर्माण करण्यासाठी देश विदेशातील शक्तींनी षड्यंत्र केलं, देवेंद्र फडणवीस

हेही वाचा…वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….

सभेत शिवाजीराव मोघे, आमदार नितीन देशमुख, संग्राम गावंडे, आदींनीही मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्तविक प्रकाश तायडे यांनी, तर संचालन मुख्तार शेख यांनी केले. आभार चंद्रकांत बारताशे यांनी मानले.

Story img Loader