नागपूर : नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला प्रतिसाद वाढल्याने ही गाडी आता पुन्हा १६ डब्यांची करण्यात येत आहे. सुरुवातीला प्रतिसाद कमी असल्याने ही गाडी १६ वरून आठ डब्यांची करण्यात आली होती. अल्प प्रसिसाद असल्याने १६ डब्यांची नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस सिकंदराबाद-तिरुपती दरम्यान चालवण्यात येत होती. तेथे धावणारी ८ डब्यांची गाडी नागपूरला देण्यात आली होती. आता प्रतिसाद वाढल्याने पुन्हा १६ डबे करण्यात येणार आहेत.
बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस चे नियमित धावते. या वंदे भारत नवीन रेकमध्ये एक एक्झिक्युटिव्ह कोच आणि सात चेअर कार कोच राहतील. नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने हा बदल करण्यात आला होता. आता वंदे भारत एक्स्प्रेस डब्यांच्या संख्येत वाढ करून प्रवाशांची क्षमता आणि सोय सुधारणा वाढवण्यात येत आहेत. वाढत्या प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी आणि प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी, बिलासपूर-नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांंची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या ८ डब्यांऐवजी १६ डब्यांची रचना १ जून २०२५ पासून लागू होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपुरात वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या गाडीत चेअर कार आहेत. सुमारे ४१३ किलोमीटरचे अंतर ती साडेपाच तासात कापते. त्यामुळे या गाडीची लोकप्रियतादेखील वाढेल, अशी अपेक्षा होती. पण रविवार, सोमवार आणि शुक्रवार वगळता या गाडीला अत्यल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले. या गाडीचा अधिकतम प्रवासी दर ६० ते ६५ टक्के आहे आणि सरासरी ५५ टक्के आहे. या गाडीला प्रतिसाद कमी प्रतिसाद मिळत असल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने अभ्यास केला असून काही उपाययोजना देखील सुचवल्या आहेत. विदर्भ आणि छत्तीसगड दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या फारशी नाही.
औषधोपचार आणि शिक्षण घेण्यासाठी रायपूरहून नागपूरला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे प्रवासी दररोज ये-जा करीत नाहीत. या दोन्ही शहरादरम्यान नोकरी, व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्याही फार नाही. त्याचा परिणाम गाडीला आवश्यक तेवढे प्रवासी मिळू शकत नसल्याचा निष्कर्ष रेल्वेच्या वाणिज्य विभागाने काढला आहे. या गाडीचे तिकीट भाडे ‘एसी थ्री टायर’चे जेवढे भाडे आहे तेवढे आहे. त्यामुळे अधिक भाडे असल्याने प्रवाशांची संख्या कमी आहे, हा मुद्दा गैरलागू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नागपूरहून ही गाडी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी सुटते आणि बिलासपूरला सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते.तर बिलासपूरहून रात्री सव्वा वाजता निघते आणि नागपूरला सकाळी पावणेसात वाजता पोहचते. आता वंदे भारत एक्सप्रेस दिवसेंदिवस देशात लोकप्रिय होत असल्याने मागणीही वाढत आहे.