नागपूर: वर्धा मार्गावरील चिंचभुवन हे अपघात प्रवणस्थळ (ब्लॅकस्पॉट) घोषित करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी गतीरोधकही न लावल्याने वाहने सुसाट धावतात, परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे.

चिंचभुवन चौरस्त्यावर एकाच वेळी चारही बाजूंनी वाहने येतात. तेथे अपघात होतात. ही जागा अपघात प्रवणस्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहे. तेथे पूर्वी चारही दिशांनी गतिरोधक लावण्यात आले होते. पण काही महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मार्गावरून जाणार असल्याने गतीरोधक काढून टाकण्यात आले. त्यानंतर पुन्हा ते लावण्यातच आले नाही. त्यामुळे आता नागपूरहून वर्धेकडे जाणारी वाहने सुसाट वेगाने धावतात, त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने येणारी वाहनेही वेगात येतात.

tigress, subway, cubs,
वाघीण आपल्या बछड्यांसह भुयारी मार्गातून जाते तेव्हा… ‘या’ राष्ट्रीय महामार्गावर…
railway collected rs 542685 from ticketless passengers at nagpur station
फुकट्या प्रवाशांना मोठा दणका…..रेल्वेच्या व्युहरचनेमुळे……
uran height barrier marathi news, uran panvel st bus marathi news
उरण: अखेर उंचीरोधक हटविल्याने चार गावांतील नागरिकांना दिलासा, वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनंतर उंचीरोधक हटविण्याची कार्यवाही
Nagpur, Allegation, encroachment,
नागपूर : महापालिकेकडूनच अतिक्रमणाचा ‘छुपा’ परवाना? खाद्यापदार्थ विक्रेते जुमानेना
remaining three lanes of the Shilphata flyover are open for traffic in thane
ठाणे : शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या
garbage dump, Solapur, fire,
सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग
Tree cutting branches on the road negligence of Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई : वृक्षछाटणीच्या फांद्या रस्त्यावर, नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष; प्रवासी, नागरिक यांना अडथळा
Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?

हेही वाचा… भंडारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एलसीबीच्या जाळ्यात; दहा हजार रुपये लाच स्वीकारताना अटक

चिंचभुवन गावातून येणाऱ्या वाहनांना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. याच मार्गावर शाळा असल्याने त्यांच्या बसेसही एकाच वेळी येत असल्याने प्रचंड वाहनकोडी होते. मात्र सरकारचे याकडे काहीही लक्ष नाही. ॲप्रोच रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. गावात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेने बांधलेल्या योगा शेडकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आजूबाजूला गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यूचा आजार वाढण्याची शक्यता आहे.