गडचिरोली : भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्याच्या उद्देशाने राज्यभरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला गडचिरोलीतील तळेगावच्या ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. यासंदर्भात तळेगाव ग्रामपंचायतीने नुकताच ठराव घेत ‘ही यात्रा आमच्या गावात नको’ अस स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही यात्रा पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकरी कामात व्यस्त आहेत. त्यामुळे दिवसभर ते शेतात राबत असतात. त्यात राज्य सरकारने गावागावात ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचे आयोजन केल्याने ग्रामस्थांना यात सहभागी होणे शक्य नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात येत असलेल्या तळेगाव ग्रामपंचायतीने मासिक सभेत ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा आमच्या गावात नको, असा ठराव घेतल्याने अखेर अत्यल्प उपस्थितीत प्रशासनाला ही यात्रा पार पाडावी लागली.

Schools closed in Pimpri city municipal commissioner order to be vigilant with emergency system
पिंपरी : शहरातील शाळा बंद, आपत्कालीन यंत्रणेने दक्ष राहण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
Bhumiputra contract workers, ONGC,
ओएनजीसीतील भूमिपुत्र कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रकल्पग्रस्त नागाव, चाणजे आणि केगाव ग्रामपंचायतींची आक्रमक भूमिका
Gold prices, Budget, Gold prices fall,
अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात आपटी, हे आहेत आजचे दर
Ambazari, Nagpur, housing project,
प्रकल्प अवैध, तरी प्रशासनाची डोळेझाक! नागपूरच्या अंबाझरीतील गृहप्रकल्पावर पर्यावरणवाद्यांचा आक्षेप
BJP state executive meeting, Balewadi, pune, police force deployed
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त, बालेवाडीत आज बैठक
Govt orders inquiry into resort on tribal land in bahul district Nagpur
आदिवासींच्या जमिनीवर रिसोर्ट, सरकारचे चौकशीचे आदेश
Citizens of Dombivli West travel on gravel roads Neglect of MMRDA Public Works Department
डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
Nashik Dam Protest, Nashik, Administration Increases Water Discharge from Kashyapi Dam, nashik news,
काश्यपीतील विसर्गात पुन्हा वाढ, दुष्काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाची मध्यस्थी; ग्रामस्थांची नरमाई

हेही वाचा : आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून ९ लाखांचे चोरबिटी बियाणे जप्त

राज्य शासनाच्या आदेशाने ठिकठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु शेतीचा हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागात नागरिक व्यस्त आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना यात सहभागी होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात विकसित भारत संकल्प यात्रा काढून नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत आग्रह करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी यात्रेला विरोध दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी चामोर्शी तालुक्यातील देखील एका तरुणाने यात्रेतील वाहनावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख असल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तशी चित्रफित समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली होती.