नागपूर : वाघनखाबाबत करार झाला असून लवकरच लंडनमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे एक लाईट अँड साउंड शो होईल. शिवाय जगदंबा तलवारीचा पत्र व्यवहार झाला आहे. काही तांत्रिक मुद्दे असून त्याचा पाठपुरावा करतो आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सुधीर मुनगंटीवार नागपुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘मी पुणेकर’ या संस्थेने काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात शिवरायांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकार त्यांना मदत करणार आहे. भारत -पाकिस्तान सीमेवर ज्यावेळी हा पुतळा उभा राहील त्यावेळी चीन वक्र दृष्टीने पाहण्याची हिंमत करणार नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहे. काँग्रेसने जेवढे देशाचे नुकसान केले आहे तेवढे कोणीच केले नाही. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी कोणती काम केली याबद्दल सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही. त्यामुळे ते टीकाटिप्पणी करत राहतात.

हेही वाचा : कोतवाल भरतीमधून स्पष्ट झाली बेरोजगारीची तीव्रता! दीडशे पदासाठी चार हजारांवर अर्ज; उच्चशिक्षितही रांगेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत अवमान करतात. काँग्रेस आता पप्पूची पार्टी होत आहे, अशी टीका त्यांनी केली. कंत्राटी पद्धतीच्या आदेशासंदर्भात भ्रम निर्माण केला जात आहे. ते लोक स्वतः आदेश वाचत नाहीत. आदेश किती पानांचा हेही त्यांना माहीती नाही. मात्र अफवा पसरवण्यात विरोधकांचा हात आहे. यापासून जनतेने सावध राहिले पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले. आपल्या देशाची प्रगती काही लोकांना पचत नाही. त्यांना वाटतं देश असाच गरीब राहिला पाहिजे आणि फक्त त्यांच्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. इंडिया फॉर इंदिरा आणि इंदिरा फॉर इंडिया या विचाराच्या बाहेर ते पडत नाहीत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.