नागपूर : अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरूवारी अपघात झाला आणि सुमारे २४२ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाला. विशेष म्हणजे याच विमानतळावर यापूर्वी १९ ऑक्टोबर १९८८ मध्ये इंडियन एयरलाइन्सचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या वेळी कोसळले होते.
या अपघातात १३३ प्रवासी आणि दोन चालक दलाचे सदस्य मरण पावले आणि दोघे बचावले होते. वैमानिकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. तसेच कठीण हवामानाच्या परिस्थितीत, ज्यामध्ये गडद धुक्यामुळे दृश्यमानता खूप कमी झाली होती. भारतातील मोठ्या विमान दुर्घटनेपैकी ही घटना आहे. अशाप्रकारे भारतात १९६२ पासून विमान अपघातांची नोंद आहे.
भारतात हवाई अपघातांचे ७ जुलै, १९६२ रोजी आलिटालिया विमानाचे अपघात झाले होते. मुंबईच्या घाटकोपर टेकड्यांमध्ये विमान कोसळले होते. त्यात ९४ प्रवासी ठार झाले. त्यावेळी भारतातील सर्वात घातक हवाई अपघात ठरला. १ जानेवारी, १७८ एयर इंडिया विमान सांताक्रूज विमानतळ, मुंबईवरून उड्डाण घेतल्यानंतर काही काळात अरबी समुद्रात कोसळले. त्यात २१३ लोक ठार झाले. २१ जून, १९८२ इंडियन एयरलाइन्स विमान भोपाळ विमानतळावर उतरवण्याच्या प्रयत्नात कोसळले. या अपघातात ५५ पैकी ५० प्रवाशांचा मृत्यू झाला.
१४ फेब्रुवारी, १९९० इंडियन एअरलाईन्स उड्डाण बंगुळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आता केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ) उतरण्याचा प्रयत्न करताना पडले. या अपघातात १४६ प्रवाशांपैकी ९२ नागरिकांचा मृत्यू झाला. १६ ऑगस्ट, १९९१ – इंडियन एअरलाईन्स विमान भुवनेश्वर विमानतळावर, ओडिशा येथे उतरण्याचा प्रयत्न करताना पडले. या अपघातात ६१ प्रवाशांपैकी ५५ लोकांचे निधन झाले. कारण पायलटच्या चुकांमुळे आणि खराब हवामानाच्या परिस्थितीमुळे असल्याचे मानले गेले.