बुलढाणा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या वतीने आज बुलढाणा चिखली राज्य मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी जास्तच आक्रमक झाल्याचे चित्र होते. महावितरणाच्या कारभारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांचे वीज बील माफ झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आवश्यक ती रक्कम भरून पैसे भरून सहा महिने उलटले तरी सौर पंपाचे कनेक्शन कधी मिळणार? त्यासाठी मुहूर्त सापडणार काय, असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यासह महिला पदाधिकाऱ्यांनी विचारला. शहरी व ग्रामीण भागात देखील सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यापूर्वी मुख्य द्वारातून प्रवेश करताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गगनभेदी घोषणा देत आपल्या आगमनाची वर्दी’ दिली. यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यात शेतकऱ्यांच्या, सामान्य वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांचा समावेश होता. अधीक्षक अभियंत्यांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले.
यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदा बढे,युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाळे, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, जिल्हा संघटक डी. एस. लहाने , उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे, माजी सभापती सुधाकर आघाव, तालुकाप्रमुख लखन गाडेकर, तालुकाप्रमुख विजय इंगळे, विजय इतवारे, अशोक मामा गव्हाणे, एडवोकेट सुमित सरदार, रवि राजपूत, गोविंद डांगर, गजानन उबरहंडे, सुनील गवते, समाधान बुधवत, अनिकेत गवळी, मोहम्मद सोफियान, रफिक शेठ, संजय शिंदे, संजय गवळी, भगवान नरोटे रंगनाथ नप्ते, कृष्णा वाघ मुजफ्फर शेख,आशिष थोरगण, मोहित राजपूत, संजय दर्डा, हरिभाऊ सिनकर, साहेबराव इतवारे, मुरली जेऊघाले,दीपक पिंपळे, मधुकर महाले,बबन खरे, संतोष नप्ते, गणेश रिंढे, निंबाजी काळवाघे, रमेश चवंड, राजू बोरसे, गुलाबराव व्यवहारे, संभाजी आघाव,अमोल जुमडे, लताताई टेकाळे, किरण पाटील, चांगदेव जाधव, प्रल्हाद काकडे, संजय चोरमुले, सोमनाथ शिरसाट, पंजाबराव गवई, संदीप जाधव, श्रावण बोरकर, प्रकाश गवळी व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.