नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानातील जागा कमी पडत असल्याने नवा अधिवास शोधण्यात आला आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत गांधीसागर अभयारण्य चित्त्यांसाठी अधिवास म्हणून विकसित करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.

चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानातील मोकळय़ा जंगलात सोडल्यानंतर ‘पवन’ नामक चित्ता वारंवार उद्यानाच्या बाहेर जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पहिल्यांदा तो बाहेर गेल्यानंतर त्याला उद्यानात परत आणले गेले. आता पुन्हा तो उद्यानाच्या बाहेर गेला असून वाघांच्या अधिवासात शिरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो शिवपुरीच्या माधव राष्ट्रीय उद्यानाशिवाय जवळच्या परिसरात फिरत आहे. शुक्रवारी त्याने कोटा-झांसी चारपदरी महामार्ग ओलांडून सरदारपुरातील एका शेताजवळ वासराची शिकार केली. एका रात्रीत त्याने ३५ किलोमीटर अंतर पार केले आणि गेल्या काही दिवसांपासून तो याच परिसरात स्थिरावला आहे. मादी चित्तादेखील या परिसरात आल्यास येथे मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच चित्त्यांसाठी नवा अधिवास विकसित करणे क्रमप्राप्त आहे.

scrap warehouses from various parts of mumbai and kurla area shifted to dombivli midc
डोंबिवली एमआयडीसीला भंगार गोदामांचा विळखा; पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
Ride a bike to survey potholes municipal administration orders officials
मुंबई : खड्ड्याच्या सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून फिरा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश
Chhagan Bhujbals suggestion on traffic congestion in Dwarka Chowk
हाजीअली चौकातील धर्तीवर उपायांची गरज, द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर छगन भुजबळ यांची सूचना
Unannounced shutdown in Kalyan city due to Prime Minister Narendra Modis meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने कल्याण शहर अघोषित बंद
Malabar Hill, Malabar Hill Residents , made unique manifesto, Malabar Hill resident manifesto, Demand Action on Parking, Demand Action on Traffic, arvind sawant, Lok Sabha Elections, Mumbai news, malbar hill news, marathi news,
नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका, मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा; मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज
Mumbai Municipal Corporation , Conservation Efforts Baobab Trees, Baobab Trees, bmc tree plantation and conservation, bmc news, Baobab Trees news,
मुंबई : बाओबाब झाडांच्या संरक्षणासाठी पालिकेला आली जाग
godown for keeping evm on plot reserved for eco park in pimpri chichanwad
इको पार्कसाठी आरक्षित भूखंडावर ईव्हीएम यंत्रे ठेवण्यासाठी गोदाम; निवडणूक आयोगाच्या कृतीची उच्च न्यायालयाकडून दखल
Financial burden, Mhada, lease,
भाडेपट्ट्यात सवलत न दिल्याने म्हाडावासीयांवर आर्थिक बोजा!

कुनोचे क्षेत्र चित्त्यांसाठी पुरेसे नसल्याचे मत यापूर्वीही अनेकदा तज्ज्ञांनी मांडले होते. मध्य प्रदेश वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत मंडळाचे सदस्य अभिलाष खांडेकर यांनी चित्त्यांसाठी नव्या घराचा शोध घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गांधीसागर अभयारण्य चित्त्यांसाठी नवा अधिवास म्हणून येत्या सहा महिन्यांत विकसित करण्यात यावे, अशा सूचना केल्या.

राजस्थानचाही पर्याय?

चित्ता प्रकल्पाचा प्रस्ताव तयार झाला त्या वेळीच मध्य प्रदेशसह राजस्थानमधील वनक्षेत्राचीही निवड अधिवासासाठी करण्यात आली होती. त्यामुळे गांधीसागर अभयारण्य येत्या सहा महिन्यांत चित्त्यांचा अधिवास म्हणून विकसित न झाल्यास राजस्थानला चित्ते हलवले जाऊ शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

चित्त्यांची संख्या वाढणार

  • ’चित्ता प्रकल्पाची आखणी झाली त्या वेळीच चित्त्यांसाठी वेगवेगळय़ा अधिवासाची चाचपणी करण्यात आली. त्यातील काहींवर शिक्कामोर्तबही करण्यात आले होते.
  • ’कारण या प्रकल्पानुसार भारतात आणखी चित्ते आणण्यात येणार आहेत. नामिबियाहून आणलेल्या मादी चित्त्याने चार शावकांना जन्म दिला आहे. त्यामुळे चित्त्यांची संख्या वाढणार हे निश्चित आहे.
  • ’म्हणूनच मी तातडीने नवा अधिवास शोधण्याबाबतचा प्रस्ताव मी सादर केला होता, असे मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाचे सदस्य अभिलाश खांडेकर यांनी सांगितले.